Author: Alpana Bapat

  • अनोख्या सौंदर्याचा फॅाल सिझन

    पानगळीने निष्पर्ण होण्याआधी

    वृक्षांच्या या रंग महोत्सवाने

    उजळतो आसमंत प्रखर तेजाने

    दिपवीत  प्रज्वलित अंगाराने

    पेटवत भवताल आपल्या मायेने

    कोण  किमयागार खेळतो

    खेळ रंगपंचमीचा वृक्षांसंगे

    हळदीचा पिवळा,केशरी 

    लाल तांबडा, रक्तवर्णी

    उधळून अनंत हस्ते

      अवाक होते मन पाहून ही 

    निसर्ग लीला अगाध

    f

    मादी वृक्षांवर फळे

    फॅाल सिझन मधील Chinese Pistache

    हा वृक्ष त्याच्या फॅालमधील रंगासाठी प्रसिद्ध आहे. हा मध्यम आकाराचा वृक्ष काजू फॅमिलीतील आहे. मुख्यतः शहरात त्याच्या फॅालमधील सौंदर्यासाठी लावतात. मादी वृक्षांवर लाल फळे लागतात ती थंडीच्या मोसमात निळी, जांभळी होतात.

    पीन ओकचा वृक्ष

    हिरवी, पिवळी, केशरी पाने एकाच वृक्षावर

    Pin Oak
    जलद वाढणारा , पानगळीचा पीन ओक वृक्ष . बहुदा मध्य व पूर्व ऊत्तर अमेरिकेत दिसतो. पाने पाच ते सहा ठिकाणी विभागलेली ( लोब्ड )असतात. याची वरची पाने वर , खालची पाने खालच्या बाजूला झुकतात व मधली पाने समांतर वाढतात.

    Ginkgo Biloba

    Ginco Bilbo’s

    हा अतिशय पुरातन वृक्ष आहे. याला living fossil म्हणतात. खूप उपयुक्त व अनेक औषधांसाठी याच्या पानांचा अर्काचा वापर होतो. याची पाने पंख्याच्या आकाराची विभागलेली ( lobed )असून वाऱ्यासंगे डुलतात व नाचतात. हे एक कॅानिफर असल्याने याला फुले येत नाहीत. पण फॅालमध्ये यांचा रंग पिवळा व नंतर सुंदर केशरी होईल.

    Catalpa flowers.

    Southern Catalpa ही सुंदर पांढरी फुले मी न्यूयॉर्कला जून महिन्यांत पाहिली होती.

    काल मी याच्या फॅाल सिझनमधील शेंगा पाहिल्या. याची मोठी ह्रदयातकृती पाने असतात. हा पानगळीचा वृक्ष आहे. वसंत ऋतूत अखेर याला गुच्छात बेलच्या आकाराची पांढरेी फुले येतात. नंतर फॅालमध्ये पानांचा रंग बदलून अरुंद लांब शेंगा लोंबकाळू लागतात. ( ती cigar सारखी दिसतात.)

    कटाल्पाच्या शेंगा.

    मेपल वृक्ष.

    Maple Asar Rubrum, गेल्या आठवड्यात माझ्या नातीच्या डे केअर जवळच्या झाडाचे रंग

    Acer Rubrum. Maple tree
    या आठवड्यात तोच वृक्ष – मेपल

    मेपल हा मध्यम आकाराचा किंवा मोठा पानझडीचा वृक्ष आहे. फॅालमध्ये पानगळ चालू झाली की मेपलची पाने सर्व प्रथम रंग बदलू लागतात. ही पाने तीन किंवा पाच ठिकाणी विभागलेली (लोब्ड ) असतात व यांच्याकडा दातेरी असतात. पहिल्यांदा या वृक्षांचे बुंधेही गुळगुळीत व करडे असतात .फॅालमधील याच्या पिवळा, भगवा व भडक लाल रंगासाठी हा वृक्ष प्रसिद्ध आहे. फॅालमधली हे वृक्ष लक्षवेधी दिसतात.

    Acer Rubrum

    मेपलची पाने Acer Rubrum

    London Plane tree.

    London plane tree

    london plane tree

    हा मोठा पानझडीचा वृक्ष आहे. याची मोठी पाने मेपलसारखी असतात याच्या बुंध्याची वरची साल अनियमित आकारात गळून पडते. ( peeling bark ) आतील हिरवट पांढरा बुंधा छान दिसतो. उन्हाळ्यात हिरवी असलेली पाने फॅालमध्ये पिवळी तपकिरी होतात. याला गोल बिया असलेली काटेरी फळे लागतात. शुशोभीकरणासाठी रस्यावर लावतात.

    Tulip Poplar .

    हा मोठा होणारा पानगळीचा वृक्ष चार ठिकाणी ( लोब्ड् ) विभागलेली असतो, याला ट्युलिप यारखी सुंदर फुले येतात. म्हणून याला ट्युलिप पॅापलर म्हणतात.फॅाल सिझनमध्ये पानांचे रंग बदलतात. सावलीसाठी हा वृक्ष उपयोगी आहे.

    Tulip tree Yellow Poplar

    Golden Rain Tree flowers

    Golden Rain tree चे पिवळे व नारिंगी पॅाडस्

    गोल्डन रेन ट्रीच्या बियांचे गुलाबी कंदील.
    Golden Rain Tree

    अतिशय सुंदर पानझडीचा वृक्ष आहे. वसंतात याला छोट्या पिवळ्या फुलांचे तुरे येतात. नंतर नंतर उन्हाळ्यात बियांच्या पेपर कंदीला सारखी फळे येतात. ती आधी हिरवी, नंतर पिवळी लाल व मग ब्राउन रंगाची होतात. आता पानेही पिवळी पडली आहेत.

    Hawthorn berries in fall.

    आता संध्याकाळी पाच वाजता काढलेला फोटो. Heritage Park.

    हथॅार्नचे अनेक वृक्ष मानसीच्या Heritage Park मध्ये आहेत .. हा एक सदाहरित झुडूपवजा वृक्ष . आहे. याची पाने हिरवीगार, चमकदार व लोब्ड असतात. याची छोटी पाने ओक वृक्षाच्या पाना सारखी दिसतात. वसंत ऋतूत याला छोटी पांढरी व लाल फुले येतात. व फॅाल सिझनमध्ये लाल फळांनी झाड भरते. ( haws) या फुलांतील मध खायला माशा,पक्षी, छोटे प्राणीही येतात. याच्या लाल पांढऱ्या फुलांमुळे व लालचुटुक बेरींमुळे रस्त्यांवर लावतात.

    Pyracantha..

    Pyracantha .

    हे छोटे झुडूप किंवा वृक्ष कंपाऊंडला किंवा पडद्यासारखा उपयोग करण्यासाठी लावतात. फॅालमध्ये त्याला लाल भडक किंवा ॲारेंज रंगाच्या बेरीज् येतात. याची पाने वेगळी आहेत. फळांचे झुपके सुंदर दिसतात.

    Pyracantha orange berries.

    स्विट गम वृक्ष

    American Sweet gum

    स्विटगमची स्टारच्या आकाराची पाने व काटेरी गोल फळे. फॅाल सिझनमधये. याची स्टारच्या आकाराची पाने पाच ते सात ठिकाणी विभागलेली असतात. ती मेपल सारखी दिसतात पण एक आड एक येतात. ( alternate )ती फॅालमध्ये पिवळी, केशरी, तांबडी होतात.

    Strawberry Tree

    गुलाबी फुले

    हा एक सदाहरित छोटेखानी वृक्ष आहे. भुमध्यसागरीहवामान व पश्चिम युरोप येथील हा मुळ वृक्ष आहे . त्याच्या सौंदर्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याची फळेही खातात. यांची चकचकीत पाने, बेलच्या आकाराची गुलाबी व पांढरी फुले व स्ट्रॉबेरीसारख्या फळांसाठी हा अनेक ठिकाणी लावतात.

    स्ट्रॉबेरी वृक्षाची फळे

    Black walnut tree in Fall season.

    ब्लॅक वॅालनटची मोठाली पाने

    Black walnurs

    हा पानगळीचा वृक्ष अमेरिकेच्या उत्तर पूर्व भागात जास्त प्रमाणात आढळतो. हा अतिशय उंच होणारा वृक्ष आहे ७० ते ९० फूट उंच होतो व ३० ते ४० फूट पसरतो. याची संयुक्त पाने असून ती १२ ते २४ इंच ही लांब असतात. यांचे लाकूड ( timber ) मौल्यवान आहे. ब्लॅक वॅालनट पौष्टिक असतात व मोठ्या प्रमाणात मिळतात.

  • Pumpkin Festival

    पंपकीन फेस्टिव्हल —
    गेल्या रविवारी आम्ही पंकीन उत्सवाला भेट दिली. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात pumpkin festival ला सुरवात होते. वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे महिनाभर ही एक जत्रा असते.
    उन्हाळ्यातले दिवस संपत आलेले असतात. फॅालला, ( autumn ) ला सुरवात झालेली असते. हळूहळू पानगळ चालू होते व पानांचे रंगही बदलू लागतात
    हे आपल्याकडच्या सारखे सुगीचे दिवस असतात. शेतात लास भोपळे, कणसे (corn maze ) तयार असतात. प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक पारंपरिक उत्सव तेथील हवामानावरही अवलंबून असतात. आपल्याकडे गणपतीला दुर्वा व अनेक प्रकारची पत्री वाहतो. पासाळ्यांत ती मुबलक असते. संक्रांतीला, थंडीत तीळाचे लाडू करतो. आपण दसऱ्याला दारावर भाताच्या लोंब्या व झेंडूची तोरणे बांधतो. शेतात भात तयार असते. तसेच या जत्रेत मोठ्या प्रमाणात लहान , मोठे भोपळे विकायला ठेवतात. ते फक्त घराबाहेर ठेवतात. त्यांवर कोरीव कामही करतात. या मेळ्याला लहान मोठे सर्वजण येतात. मुलांसाठी अनेक खेळ , खाण्याचे स्टॉल असतात. हे एक स्नेहसंमेलनच असते.

    पंपकीन फेस्टिव्हल —


    Home decoration
  • गोल्डन गेट पार्क

    निसर्ग सौंदर्य संपन्न कॅलिफोर्निया

    कॅलिफोर्नियात अभिमान व गर्व करावा अशी पन्नास उद्याने आहेत. त्यांतील बहुतांश नवश्रीमंत लोकांची खाजगी कौटुंबिक मालमत्ता होती. आता ती बहूतेक सर्वासाठी खुली आहेत अल्काट्राझ (rock ) बेटावरील कैदी व तेथील कर्मचाऱ्यांनी लावलेल्या व वाढवलेल्या सुंदर बागा, या मुख्यतः येथे तुरुंगाचे अस्तित्व असलेल्या काळातील आहेत. अतिशय कठोर वातावरण, कठीण खडकावर बागांची निर्मिती यात माणसाची निसर्गाशी संलग्न असण्याची गरज व आवड दिसते.फिलोली गार्डन, वॅालनट स्ट्रीटवरचे चार एकराचे छोटेसे कॅकटस व सक्युलंट बॅनक्रोफ्ट गार्डन, मॅलबू मधील -होडा अॅडामसन हाऊस व गार्डन , पॅलो एलटो येथील एलिझाबेथ गॅम्बल गार्डन, ( Elizabeth. F. Gamble Garden ) प्रोक्टर आणि गॅम्बल मधील गॅम्बल कुटुंबातील एलिझाबेथने तयार केलेली बाग, येथील एक भाग ( Roots and Shoots planting) पूर्णतः तिसरीतील मुले वाढवतात व काळजी घेतात. सध्याच्या स्क्रिनला चिकटलेल्या प्रत्येक लहान मुलाला ही संधी मिळाली पाहिजे. या सर्व खाजगी व कौटुंबिक बागा आता , पब्लिक पार्क’, मध्ये त्यांचे रुपांतर झाले आहे.

    कॅलिफोर्नियात गोल्डरश नंतर , नवोदित श्रीमंत लोकांना त्यांच्या मालकीच्या सुंदर, नयनरम्य बागा हव्या होत्या. येथील भुमध्यसागरी हवामानही त्यास अनुकूल आहे. येथील विविध शहरांतील वडील व श्रीमंत लोकांना नैसर्गिक सौंदर्य व विविध रंगांनी, फुलांनी नटलेल्या बागांची गरज वाटली या लोकांनी पुढाकार घेऊन, निधी गोळा करून, स्थानिक सरकारच्या मदतीने अशा बागा व उद्यानांची निर्मिती केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे , ‘गोल्डन गेट पार्क.’ पूर्ण वालुकामय असूनही १०१७ एकरावर सुंदर उद्यान उभारण्यात आले त्यात विविध प्रकारच्या बागा व म्युझियम आहेत . या जागतिक दर्जाच्या उद्यानाचा इतिहास, त्याचे संवर्धन, सर्वच विलक्षण व विस्मयकारक आहे. तेथे पर्यवेक्षक म्हणून ५३ वर्ष काम करणाऱ्या john McLaren ची निष्ठा व सेवा सर्वच प्रशंसनीय आहे. अनेक दशके किंवा शतकांपासून या बागांची योग्य निगा राखून काळानुसार संवर्धन व विकास केले गेले. नवीन गोष्टींची त्यात भर पडत गेली. यांत वय्यक्तिक, सेवाभावी संस्थाचेही योगदान आहे.

    गोल्डन गेट पार्क

    न्ययॅार्क सारख्या शहरात असलेली उद्याने व राष्ट्रीय उद्याने यांच्यात महत्वाचा फरक आहे.

    राष्ट्रीय उद्याने ही अतिशय मोठी , विरळ लोकवस्तीच्या ठिकाणी दूरवर पसरलेली असतात. त्यांचा मुख्य उद्देश मोठ्या भूप्रदेशाचे वातावरण संरक्षण, नैसर्गिक अधिवास व सौंदर्य जपणे, वन्यजीवन, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळाची जपणूक हा असतो.अशी उद्याने कोविद शासित असतात.

    दाट लोकवस्तीच्या शहरांत हिरव्या जागा निर्माण केल्या जातात. तेथे करमणूकीची सोय, उत्सव साजरे करणे ,खेळ, ऱ्स्वच्छ हवा पाणी व मोकळे वातावरण असते. ही उद्याने वृक्ष, फुले वेलीनी नटलेली असतात. याची देखभाल तेथील स्थानिक सरकार करते.

    न्युयॅार्कला जे सेन्ट्रल पार्कचे महत्व आहे तेच कॅलिफोर्नियाच्या गोल्डन गेट पार्कला आहे. हा पार्क सेंन्ट्रल पार्कपेक्षा जास्त मोठा आहे व समुद्राला लागून आहे. या पार्कची गणना जगातील मोठ्या प्रसिद्ध पार्कमध्ये होऊ शकते. या पार्कच्या प्रत्येक वळणावर विस्मयकारक जागा व गोष्टी आहेत. येथे दोन मोठे म्युझीयम, राष्ट्रीय AID चे स्मारक, गव्याचा कळप, समुद्रालगत चौपाटी, व्हिक्टोरियन ग्लास हाऊस, लेक्स्, व सॅनफ्रॅन्सिसको बोटॅनिकल गार्डनचीही यांत समावेश होतो.

    १८५० मधील गोल्डरशने सॅनफ्रॅन्सिसको येथे हजारोंच्या संख्येने लोक येथे आले व प्रचंड संपत्तीची निर्मिती झाली. शहरांतील वडील लोकांना त्यांच्या वैभवाचे प्रतीक व त्यांच्या सतत विकासाला चालना देण्यासाठी एक मोठे उद्यान आवश्यक वाटत होते. १८७० मध्ये १८ वर्षे बोलणी केल्यावर स्थानिक नेते येथील सरकारकडून १०१७ एकर जमीन मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांनी भुरचनेचा अभ्यासकरण्यासाठी (सर्वेक्षण ) एका सर्वेक्षकाची नेमणूक केली. पण त्यांची मुख्य समस्या होती की ही उद्यानाची जागा म्हणजे वाळू व वाळूचे ढीगारे या शिवाय दुसरे काहीही नव्हते ‘ सेन्ट्रलपार्क’ चा डिझाईनर फ्रेड्रिक ओल्मस्टेड याला त्या जागेविषयी मत विचारले असता त्याने ती जागा अशक्य म्हणून नाकारली.

    विल्यम हॅामंड हॅालला जेव्हा सर्वेक्षक म्हणून नेमण्यांत आले तेव्हा तो फक्त २५ वर्षांचा होता. तो स्थापत्य अभियंता ( सिव्हिल इंजिनिअर ) होता. त्याला बागायती कामाचे शास्त्र व परिसर सुशोभीकरण यांची फारशी माहिती नव्हती. तो लौकरच पारंगत झाला व त्याला गोल्डन गेट पार्कचा पहिला पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. न्युयॅार्क मधील सेंट्रलपार्क हे देशात एकमेव उद्यान या आकाराचे व पद्धतीचे होते. हॅालने ॲाल्मस्टेड पासून कल्पना व प्रेरणा घेऊन आकर्षक पद्धत, वळणावळणांचे रस्ते,पदपथ व नैसर्गिक गोष्टींचा समावेश केला. त्यावेळी पर्यावरणशास्त्राची कल्पनाही अस्तित्वात नव्हती. हॅालला अतिसूक्ष्म हवामान व तेथील वनस्पतींचे महत्त्व माहीत होते. उद्यानाच्या वालुकामय मातीत व त्याच्या आसपासच्या आठ तलावाभोवती ( आता पाच) असलेल्या खुज्या ओकचे वृक्ष ( scrub Oaks ),खुजे लुपीन्न्स ( Scrub lupine) व जंगली विलो उपटण्याची कोणालाही परवानगी नव्हती.

    १८७१ मध्ये हॅालने पहिले वृक्ष उद्यानाच्या चिंचोळ्या लांब उत्तरपूर्व (panhandle section ) भागात लावले . त्यामध्ये मॅानटेरी पाइन्स, मॅानटेरी सायप्रसu व १० प्रकारचे निलगीरीचे वृक्ष होते ( Eucalyptus) .हॅालने वाळूच्या ढिगा-यापासून माती मिळवण्यास सुरुवात केली त्यामुळे उद्यान समुद्रापासून वेगळे झाले. पण काही राजकारणी लोकांनी सूडबुद्धीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांचे काम अचानकपणे बंद झाले व त्याला राजीनामा द्यायला भाग पाडले. त्यानंतर पूढील १० वर्षे उद्यानाचे काम वंद होते. पश्चातापदग्ध सुपरवायजरच्या बोर्डाने त्याला परत त्याच्या कामावर बोलावले . हॅालने त्यास नकार दिला. पण त्याने या कामासाठी जॅान मेलार्न यांचे नाव सुचवले. ही एक प्रेरित निवड होती. १८८७ मध्ये जॅान मेलॅार्नने गोल्डन गेट पार्कचा पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याने या जागेवर ५३ वर्षे काम केले. ‘मेलॅार्न लॅाज’ येथे तो १८९० पासून १९४३ पर्यंत राहत होता ते आजही उद्यानाचे मुख्यालय म्हणून वापरले जाते.

    हा स्कॅाटलंडचा रहिवासी अतिशय शिस्तप्रिय व महत्त्वाकांक्षी होता. त्याने सॅनफ्रॅन्सिसकोला येण्यापूर्वी स्कॅाटीश इस्टेटवर उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी उमेदवारी केली होती. येथे आल्यावर त्याने नव्याने गोल्डरशनध्ये श्रीमंत झालेल्या लोकांसाठी उद्याने तयार केली होती. कुठे काय लावायचे यासंबंधी त्याच्या निश्चित कल्पना होत्या. एकावर्षांत ६०००० पेक्षा जास्त बाभळीची झाडे ( Acacia) लावली गेली. त्यानंतर ६० वेगवेगळ्या जातीची पाच लाख बाभळीचे वृक्ष जास्त मोन्टेरी पाईनस् व सायप्रस लावले गेले. मेर्लानला -होडोडेंड्रॅान वृक्ष आवडत होते म्हणून त्याने हॅालच्या निसर्गरम्य उद्यानात आणखी -होडोडेंन्ड्रॅान लावले. आता ते अधिकृतपणे ‘जॅान मेलॅार्न ऱ्होडोडेंड्रॉन डेल’ (दरी ) म्हणून ओळखले जाते. हॅालच्चा नैर्सगिक पद्धतीपेक्षा त्याला संमिश्र पद्धत पसंत होती. त्याची कित्येक उद्याने प्रमाणबद्ध सारखेपणा असलेली व सौंदर्य दृष्टीने तयार केलेली होती. वृक्ष हे वारा अडविण्याच्या उपयुक्ततेसाठी व आकर्षणासीठी, सौंदर्यासाठी लावले गेले.

    या एकाधिकारी पण नम्र व विनयशील स्कॅाटिश माणसाच्या ह्रदयांत उद्याना विषयी पूर्ण आत्मीयता होती. त्याला जेव्हा विचारले गेले की तुला वाढदिवसानिमित्त काय बक्षीस हवे आहे? तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘ मला १,०००,००० किलो. गोठ्यातील खत हवे आहे. ‘ यावरून त्याचे उद्यानावरील प्रेम दिसून आले. त्याची इच्छा पूर्ण झाली व त्याने ते खत वाळूच्या ढिगा-यावर पसरले व त्यावरील लागवड पूर्ण केली. त्याने युरोपियन बीच ग्रास, वाहणा-या वाळूला बांधून ठेवण्यासाठी वापरले. या गवताचे बी त्याने पॅरिसमधून आयात केले.

    १८७९ मध्ये हॅालच्या राजिनाम्यानंतर व मॅलर्न येण्यापूर्वी

    The Conservatory of flowers ( फुलांच्या संरक्षणासाठी असलेली ) ही अतिशय प्रसिद्ध इमारत बांधून तयार झाली. हे १२,००० sq. ft. व्हिक्टोरिअन ग्लासहाउस आहे. ही उद्यानातील सर्वात जुनी व अमेरिकेतील अशा जून्या इमारती पैकी एक आहे. या इमारतीच्या पूर्वेला दुष्काळी भागातील किंवी कमी पाण्यावर जगणा-या वनस्पतींचे अॅरिझोना बाग आहे. पश्चिमेकडे उन्हाळ्यात फुलणारी डेलिया बाग आहे. सुशोभित लाकूड व काच याने बनलेले कॅान्झर्वटरीच्या घुमटात १७०० प्रकारच्या पाण व विषुववृतीय वनस्पती आहेत. त्यामध्ये ॲार्किडस्, प्राणीभक्षक वनस्पती, भव्व्य लीली आहेत. उपयुक्त कीटक व मुक्तपणे फिरणाऱ्या पालींचा तांडा उपद्रवी किटकांवर नियंत्रण ठेवतो. १९०६ सालच्या भूकंपात कॅान्झर्वेटरी वाचली. पण त्याच्या आजूबाजूचे अनेक वृक्ष, वनस्पती, हिरवळ जगली नाही. मोठ्या संख्येने आलेल्या,बेघर सॅनफ्रॅन्सिस्कोवासीयांनी त्याचा नाश केला.त्यांनी कॅान्झर्व्हेटरी दरीत उतररून , मिलीटरीने उभारलेल्या तंबूत निवास केला

    राष्ट्रीय एडस् स्मारक विभाग , हे , जे एडसच्या आजाराने मरण पावले व त्यांच्या आप्तांसाठी, ज्यांनी या आपत्तींचे बळी असणाऱ्यावर प्रेम केले व त्यांचा लढा पाहिला त्यांच्यासाठी एक सुंदर जिवंत स्मारक आहे . एडसच्या साथीच्या रोगामुळे सॅनफ्रॅन्सिसको उध्वस्त झाले. यांच्या स्मारकासाठी, १९९१ मध्ये परिसर सुशोभित करणारे वास्तु शिल्पकार, स्वयंसेवक, इतर कामगार व बागकाम करणा-यांनी सात एकराची जागा de Laveaga Dell ( दरी ) मधून पुन्हा जमीन मिळविण्यास सुरवात केली .हे काम १९९६ मध्ये पूर्ण झाले. हे पहिले व एकमेव केंद्र शासित स्मारक आहे.

    याच्या पश्चिमेकडे Sunken open Air Plaza ‘ The Music Coneourde ‘ (खालच्या पातळीवरील मोकळा चौक) आहे. ही जागा फ्रेंच उद्यान व विशिष्ट पद्धतीने कापलेले ( pollarded) लंडन प्लॅनचे वृक्ष( London plane trees ) व Wych Elms ( एकप्रकारे वावळ ) यांनी सुशोभित केलेली आहे. आणखी एक विशेष उल्लेखनीय इमारत विज्ञान अकादमी (Academy of Science ) हे अत्याधुनिक नैसर्गिक इतिहास संग्रहालय आहे. ( Natural history museum ) १९२४ सालात उभारलेला पूर्वीच्या विज्ञान संग्रहालयाच्या ठिकाणी हे उभारले गेले.

    पाच एकरावर असलेली जपानी बाग ही देशातील सर्वात जुनी जपानी बाग आहे. ही बाग,१८९४ मध्ये झालेल्या प्रदर्शनाचा भाग होती. त्यांत जपानमधील गावाचे दृश्य होते. जपानी संस्कृतीचे भारावून गेलेल्या एका ॲास्ट्रेलियन व्यापाऱ्यानी, जॅार्ज टर्नर मार्शल , याने ती बाग तयार केली होती. तो जपान मध्ये राहिला होता. त्या काळात आशियातील संस्कृती अनोखी, अपरिचित होती. लोकांनी यापूर्वी अशी बाग पाहिली नव्हती. प्रदर्शन संपल्यावरही ‘जपानी टी गार्डन ‘ तसेच ठेवण्यात आले. बागेच्या सुशोभीकरणासाटी व बागेची काळजी घेण्यासाठी एका जपानी व्यक्तीला नियुक्त करण्यात आले. स्टोव लेकच्या काठांवर चीनी मंडपाला भेट देऊ शकता व स्ट्रॉबेरीचा डोंगर चढू शकता. तसेच तुम्हाला अमेरिकन ‘ बायसन’ चे बंदिस्त कुरणही बघता येते .हा एका काळातील प्रसिद्ध सस्तन प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर होता.१८९१ मध्ये पहिल्यांदा त्यांना येथे आणण्यात आले.

    दोन ऐतिहासिक पवनचक्क्या येथे आणण्यात आल्या.१९०३ मध्ये ऊभारलेली पवनचक्कीने उद्यानात ताजे पाणी मिळत असे.. त्याच्या शेजारीच् ट्युलीपची बाग वसंतऋतुत पेटल्यासारखी दिसते. आणखी अनेक गोष्टींचे वर्णन करत येण्यासारखे आहे. हे सुंदर उद्यान, अनेक दशकांपासून त्याचा वापर, दुरुपयोग, पुर्नशोध यात टिकून राहिले आहे.

    The Conservatory of flowers.

    The Conservatory of Flowers is a greenhouse and botanical garden that houses a collection of rare and exotic plants in Golden Gate Park

    Monterey pines at Golden Gate park

    Cherry blossom at, Japanese Tea Garden

    Golden gate park trail through Silver wattle , Acacia Dealbata

    Giant lilies in Golden Gate Park

  • Camel Karma – Chapter 4 – अंजी की धानी

    विसाव्या शतकाच्या सुरवातीला १०,००० उंट होते.चाळीस वर्षांपूर्वी ५००० उंट होते आता गावांत १००० उंट आहेत आणखी दहा वर्षानी काहीच उंट शिल्लक राहाणार नाहीत.
    रुपाराम रायका अंजी-की- धानी.

    गॅरी,जॅान व आएशा विमानाने ऊदयपूरला येतात. हणमंतसिंगच्या गाडीने सगळे साद्रीला येतात. डॅा. देवाराम ऊत्साहाने पुढचे प्लॅन बनवतो. त्याच्यामते तिने मारु रायकांना भेटणे जास्त गरजेचे होते. मारु रायका हे उंटांचे खरे प्रजनक आहेत.गोदवारच्या रायकांनी फक्त शंभर वर्षांपूर्वी उंट पाळायला सुरवात केली. डॅा. देवारामला त्यांना अंजी-की- धानी या गावांत घेऊन जायचे असते. त्या गावात हजारो उंट असतात. हणमंतच्या गाडीत विनय व सर्वजण दाटीने बसतात. अंजी-की- धानी हे अतिशय सुस्त गाव असते जेथे काळ जणू थांबलेलाच असतो.
    गावाच्या प्रवेशद्वाराशी ओळींत पांढरे स्मरणार्थ
    दगड असतात. त्यावर त्यांचे आदरणीय पूर्वज उंटावर बसलेले असतात. त्याच्या बाजूलाच भव्य कडुलिंबाच्या झाडाभोवती मोठ्या कट्ट्यावर वृद्ध माणसे आराम करत असतात. तो कट्टा येणाऱ्या पाहुण्यांसाठी करमणुकीसाठी बांधलेला असतो. कोणीतरी वाफाळलेला उंटाच्या दुधाचा चहा आणून देतो .देवाराम त्यांच्या येण्याचे कारण सांगतो. तिच्या मुलांच्या तपकिरी केसाने व गोऱ्या कातडीने सर्वांची उत्सुकता वाढते. मुले रायकांच्या मुलांत खेळायला जातात ती मुले मातीचे ऊंट करतांत
    तेवढ्यांत देवारामला समजते की. येथील उंट वीस कळपांत विखुरलेल आहेत. ते वेगवेगळ्या जागी चरत असतात व वर्षातून फक्त एकदा होळीच्या वेळेस अंजी-की -घानाीला येतात. ती
    खूप निराश होते. त्यांच्यातील एक तिला सांगतो की, त्याचा तोला (. कळप ) जवळच रात्री मुक्कामालाआहे.. ते सकाळी सात वाजेपर्यंत त्यांना बघायला येऊ शकतात. ते डॅा. देवारामकडे रात्रीचा मुक्काम करायचे ठरवतात. डॅा देवाराम पचुंदा कलान नावाच्या गावात राहत असतो. त्याचे छोटे घर छान असते. त्याचे आईवडील व दोन मुले व बायको राहतात. शेजारीच त्याच्या तीन भावांचीही घरे असतात. ते मेंढ्यांना घेऊन फिरतीवर असतात. डॅा. देवारामच्या नात्यातल्या सर्व बायका तिला भेटायला उत्सुक असतात व तिलाही त्यांच्याशी मैत्री करायची असते.बायकांचा व मुलींचा घोळका तिची वाट बघत असतो. त्या तिला घेरतात. तिच्या कपड्याना हात लावून बघतात. तिचे गालगुच्चे घेतात.मोठ्यांदा बोलतात. एकजण मोठ्या गोणीत असलेले चांदीचे दागिने ओढत आणते .अनेक प्रकारचे दागिने त्या घालतात. रंगीबेरंगी कपडे घालतात. ओढण्या घेतात . तिला अनेक फोटो काढायला लावतात तरी त्यांचे समाधान होत नाही. त्यांचा ऊत्साह ओसंडून जात असतो. शेवटी ती दमते.
    दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते ठरवलेल्या जागी येतात. अडोजीचा देखणा मुलगा गौतमराम गुलाबी फेट्यात त्यांची वाट बघत ऊभा असतो. त्याची गाडी खडबडीत धुळीच्या रस्यावरून बाभळीच्या जंगलातून जाते. त्या उंटांचा कळप तोला, चौधरीच्या मोहरीच्या कापणी केलेल्या शेतात असतो. काही उंट त्यांचा कडबा रवंथ करत असतात तर काही उभे असतात. त्याचे बांधलेले पाय सोडायची वाट बघत.नवीन जन्मलेली वासरे बागडत दुडदुड उड्या मारत होती.आवाज करत आपल्या आजूबाजूचा प्रदेश न्याहाळत होती.त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फेटे घातलेली माणसे होती. त्यांच्यातला पिवळा फेटा धातलेला अडोजी होता. त्याने त्यांना
    शेताच्या टोकाला असलेल्या शेकोटीशी जायला सांगितले. त्याने यांच्यासाठी बसायला भाकल ( उंटाच्या केसापासून बनवलेली सतरंजी)घातले व ताज्या चहासाठी ऊटाचे दूध काढायला सांगितले. जॅान व आयेशा त्यांच्या आईला धावत , धावत सांगत आले की एक मादी उंट नवीन पिल्लाला जन्म देत होती. एका बाभळीच्या झाडाच्या सावलीत एक मादी उंट नवीन वासराला जन्म देत होती. एक रायका तिच्याशी अतिशय सौम्य व समजावणीच्या सुरांत बोलत होता. अगदी काही मिनीटांतच नवीन वासराचा जन्म झाला. इल्सच्या मते हे ऊंटाचे बाळंतपण इतर प्राण्याच्या तुलनेने अतिशय जलद व दुःख रहित होते. ते नवीन जन्मलेले अभ्रक त्याच्या उंच व बारीक पायांवर उभे राहण्याचा लगेच प्रयत्न करीत होते पण ते खाली पडते. अर्धातासाने परत धडपडत उभे राहायचा प्रयत्न करते पण पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली पडते.
    तोपर्यंत बाकीच्या कळपाची चरायला जायची वेळ झालेली असते. ते रात्रीच्या मुक्कामाला परत तेथे येणार असतात. हे ऊंटांचे कळप एका ठिकाणी कधीही दोन दिवसापेक्षा जास्त दिवस मुक्काम करत नाहीत. त्यामुळे सतत नवीन जागेच्या शोधात रहावे लागे. हे काम अडोजीचे होते. त्याचे जमीनदारांशी दीर्घकालीन संबंध होते. ते त्याच्या ऊंटाना बोलवत असत कारण त्यांना उंटांचे शेण मिळत असे. त्या बदल्यात अडोजीला पैसे मिळत असत.
    होळीच्या वेळी हे सर्व उंट अंजी -की – धानीला एकत्र येत असत. त्यांची लोकर कापण्याचा कार्यक्रम असे. सर्व गावकरी आपापल्या परीने मदत करत. अडोजीने त्यांना अतिशय आग्रहाने परत होळीला यायचे आमंत्रण दिले. त्यावेळेस अंजी-की -धानी ला २०००० ते३००००. उंट जमा होतात. होळी हा सण हिवाळ्याचा शेवट व उन्हाळ्याची सुरवात दर्शवितो. हा सण रंगांची उधळण करून साजरा केला जातो.

    या वेळेला अडोजीबरोबर विचारांची अविस्मरणीय देवाण घेवाण होते व ती लांबून सुरक्षित शैक्षणीय अंतर ठेऊन बघणारी व सहानुभूती दाखवणारी न रहाता सक्रीय भागधारक होते. अडोजीचा त्याला व त्याच्या संधटनेला मदत करण्याची विनंती तिच्या डोक्यात घुमत राहते. त्याचे म्हणणे तिला पटते की फक्त फोटो घेऊन काय फायदा? तिने कॅम्प घ्यावेत. तिला खरोखरच समजत नाही की कसले कॅम्प घ्यायचे ? तिला मिळणारे अनुदान अतिशय तुटपुंजेच असते. तिला वाटते की या सगळ्यासाठी तिला त्यांच्या समस्यांविषयी माहिती , आकडेवारी लागेल जी तिच्याजवळ नसते. ते साद्रीला परत आल्यावर माहिती गोळा करायला लागतात.
    विनय अनेक लोकांशी बोलून तिला माहिती मिळवण्यासाठी मदत करतो.साद्रीच्या आसपास मिळून ५००० ऊंट असतांत. पण मागील दहा वर्षांपासून त्यांना चरायला जागा मिळणे कठीण होत जाते. यांचे मुख्य कारण म्हणजे जास्त , जास्त खोल विहीरी खणल्या जात होत्या जेणेकरून शेतकऱ्यांना दोन किंवा तीन सुद्धा पिके घेता येतील. पडीक जमीन, चराऊ कुरणे कमी झाली होती. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व गावांची स्वतःची चराऊ जमीन असे तिला ‘गोचर ‘ म्हणत. पण अशा जमिनीकडे संपूर्ण दुर्लक्ष होते व ती जागा झुडुपांनी व्यापते जी गुरांना खाण्यासाठीं योग्य राहत नाही. मुख्य संकट पावसाळ्यात येते. पूर्वी पावसांळ्यात जेव्हा शेतात पिके घेतली जात तेव्हां शेकडो वर्ष उंट आरवली पर्वतांच्या जंगलांत चरत, पण आता साद्रीच्या आजूबाजूची जंगल, ‘वन्य अभयारण्य ‘ म्हणून घोषीत होतात व ती कुंभलगड अभयारण्याचा भाग होतात. त्यामुळे तेथे चरण्यांस बंदी येते.
    भालाराम रायका त्यांना सांगतो की हे संकट १९७५ पासून आणीबाणीच्या काळांत सुरू होते. सरकार वीस सूत्री कार्यक्रम अंमलात आणते . त्यांत एक कलम असे असते की जंगलांना संरक्षण व नर्सरीची स्थापना. सरकार सर्व चराऊ जनावरांवर पैसे आकारायला लागते . चराऊ ऊंटांवर दिवसाचा२.५ इतका कर आकारला जातो.नव्वद साली सर्व चराऊ जनावरांवर जंगलांत बंदी आणण्यात येत. पुढचे सरकार ती बंदी उठवते पण बंदिस्त जंगलाचा भाग उघडला जात नाही. असा गोंधळ चालू रहातो.
    रायका जागतिक बँकेच्या प्रोग्राम विषयी तक्रार करतात तेव्हां त्यांना मेंढ्याची संख्या कमी करा व तुमच्या मुलांना शिकवा असे उत्तर मिळते.
    त्याची जनावरे जंगलात चरतांना आढळली तर जप्त केली जातात .
    ती जमेल तशी माहिती गोळा करायचा प्रयत्न करते. या सर्व अडचणी समजून घेण्यासाठी,
    एका नावाने ती मोहित होते ते म्हणजे , राजपूत हिरो पाबुजी . स्थानिक पौराणिक कथेनुसार पाऱ्बुजी हा पहिल्यांदा उंट राजस्थान मध्ये आणतो.डॅा. देवाराम तिला त्याच्या गावातल्या पाबुजीच छोटेसे देऊळ दाखवतो.. उंटाविषयी कोणतीही नवीन गोष्ट करतांना मारु रायका प्रथम प्रसाद ठेवतात. पाबुजीने उंट राजस्थानांत कसे आणले यांचे उत्तर फक्त भोपासागू शकेल असे विनय व डॅा. देवाराम सांगतात. ते तिला सांगतात की भोपा या लोकांना पाबुजीची पूर्ण कथा माहीत आहे . ते पाबुजींचे पुरोहित असतात.त्यांच्याकडे कापडाची लांब गुंडाळी असते. त्याच्यामध्ये पाबुजीच्या जीवनांतील अनेक प्रसंगांचे चित्रण असते. त्याला पार्ह असे म्हणतात.त्याला हलणारी वेदी किंवा पवित्र जागा म्हणतात. ती फक्त रात्रीच उघडली जाते.
    साद्री जवळच्या एका गावांत एक भोपा रहात असतो . तो फक्त कापडाचा स्क्रोल ( गुंडाळी ) उघडून दाखवायला तयार नसतो. त्याला पूर्ण प्रयोग दाखवायचा असतो. एका गावातील एक उंट आजारी असतो. त्याचा मालकाने भोपाला त्यांच्या गावात प्रयोगासाठी बोलावले असते.पण त्याच्याकडे पैसे नसतात.पाबुजीची पूर्ण गोष्ट दाखवायला चौदा रात्री लागल्या असत्या . म्हणून ते पाबूजीच्या आयुष्यांतील एक प्रसंग निवडतात.
    लाल व तपकिरी रंगाचे मादी उंट राजस्थानात आणण्याची गोष्ट.
    भद्रासला गावांच्या देवस्थानाच्या मोकळ्या जागी ती व हणमंत भोपा व भोपीला आणायला जातात. ते खरोखरच अतिशय गरीब असतात .त्यांच्या जुन्या कपड्यांकडे पाहून तिला जाणवते. तिन्हीसांजेला ते गावात येतात. पूर्ण गाव तो प्रयोग बघायला गोळा झालेला असतो.
    संगीत,गाणे , नाच व पठण , तिला व लहान मुलांना मंत्रमुग्ध करते. तिला त्यातील एकाही शब्दाचा अर्थ कळत नाही.
    विनय तिला अर्थ सांगायाचा प्रयत्न करतो.
    एकदा पुष्करला भेट दिली असतांना पाबुजी त्याच्या पुतणीचे लग्न गोगाजी चौहाण याच्याशी जमवतो.पाबुजी तिला लग्नाची काहीतरी असामान्य भेट द्यायचे कबूल करतो. तो तिला लाल व तपकिरी रंगाचे मादी उंट द्यायचे कबूल करतो. ते कुठे मिळतील हे त्याला माहित नसते. तो हरमल रायकाला रावणाच्या लंकेत पाठवतो. तो संन्याशाच्यावेशांत जातो.
    रावणाचे सैनिक त्याला पकडतात. तो त्यांच्याकडे थोडे दूध मागतो . ते सांगतात की त्याच्याकडे फक्त लाल व तपकिरी मादी उंटाचे दूध आहे. हरमल रायका राजस्थानला परत येतो व पाबुजीला उंटा विषयी सांगतो. पाबुजी रावणाचा पराभव करतो व सातशे दूध देणारे व सातशे इतर उंट घेऊन येतो.
    त्यानंतर एप्रिल चालू होतो. अतिशय गरम होऊ लागते. ती लडाखला थंड हवेत ट्रेकिंगला जाते. ती पुस्तकाच्या सहाय्याने हिंदी शिकण्याचा प्रयत्न करते.
    तिला परत एकदा राजस्थानला शेवटची भेट
    देऊन सगळ्यांचा निरोप घ्यायचा असतो व तिला अपराधीपणाची भावना मनातून काढून टाकायची असते. ती तिच्या नुकत्याच शिकलेल्या हिंदीत अतिशय काळजीपूर्वक हणमंतला पोस्टकार्ड टाकते व जोधपूर एअरपोर्टला बोलावते. ती साद्रीला डॅा.देवारामला भेटते. ते रायकांसाठी काय करता येईल यावर विचार करतात. डॅा.देवाराम सांगतो की त्याला त्याच्या जातीसाठी एक सोसायटी तयार करायची आहे. त्याची जात अतिशय मागासलेली आहे त्यांना सुधारायची गरज आहे.
    त्यांच्या बायकांना स्वच्छतेचे धडे द्यायची गरज आहें .तसेच महिलांना पैसे मिळविण्याचे साधनही द्यायला हवे. इल्स सांगते की त्यांच्या उंटाना औषधे द्यायची गरज आहे.
    ती तेथून डॅा. खन्नांना भेटायला बिकानेरला जाते. त्यांना तिच्या संशोधनाची प्रत देते.
    नंतर ती जयपूरला जायला निघते. बाहेर वातावरण भट्टी सारखे गरम असते.
    रात्री ती तेथील संस्कृती व रीति रिवाजांवर विचार करते व अजूनही तिला स्वतःला ती उपरी असल्यासाखे वाटते.राजस्थानी जेवण तिला कधीच मानवत नाही कारण मिर्ची व तुपाचाखूप वापर . त्यामुळं केळी , पार्ले बिस्कीटस व अनेक चहाचे कप यावरच ती राहते . आणखीन एका गोष्टींचे तिला आश्चर्य वाटते म्हणजे कोणीच आपल्या भावना व्यक्त करीत नाही.
    अनेक दिवसांनी डॅा. देवाराम त्याच्या घरी जातो तेव्हां त्याची बायको त्याची दखलही घेत नाही . ती आपले काम चालू ठेवते. कोणालाच भावना नसतात का? त्याची मुलेही त्याच्या जवळ येत नाहीत. डॅा.देवाराम तिला सांगतो की त्यांच्या समाजात एकत्र कुटुंब पद्धतीत मुलें सर्वांचीच असतात. त्यालाही आपल्या मुलांना जवळ धेता येत नाही याचे वैशम्य वाटते. पण घरांतील वडिलधाऱ्या माणसांसमोर प्रेम व्यक्त करणे त्यांच्या संस्कृतीत बसत नाही.
    तरीही अशा चमत्कारिक व अनाकलनीय वातावरणात तिला परत यायचे असते.
    तिला राजस्थानी समाजाचे भाग व्हायचे असते . परकीय म्हणून राहायाचे नसते.

    • [ ] आणखी एक कारण म्हणजे तिचा ड्रायव्हर. तो अतिशय अबोल व लाजरा असतो. त्याच्या नावाखेरीज तिला काहीच माहित नसते. पण त्याची गाडी म्हणजे तिचे आश्रयस्थान असते. तो तिचा आधार असतो. तो तिच्या संरक्षणार्थ नेहमी हजर होतो . गाडीमध्ये फक्त ते दोघे असल्या शिवाय तो थेट तिच्याशी कधीच बोलत नसे. जेव्हा ते गाडीतून बाहेर पडायचे तेव्हा तो जवळ येण्याचे टाळत असे . जणू त्याला तिच्या सोबत दिसण्याची लाज वाटे . ते चहासाठी ढाब्यावर थांबले तर साहजिकच ती बसण्यासाठी त्याच्या शेजारी असलेली खुर्ची निवडत असे. पण तो उठून दुसऱ्या ठिकाणी खुर्चीवर बसत असे जेणेकरुन त्यांच्यामध्ये थोडे अंतर राहील. हे पाहून तिला वाईट वाटे पण दुसरीकडे, जेव्हा तिला त्याची गरज भासे तेव्हा तो हजर असे . जर ती कधी संकटात सापडली किंवा कोणीतरी तिला त्रास दिला, तर तो तिला संकटातून बाहेर काढण्यासाठी जादूने कोठूनही प्रकट होई . तिच्या प्रमाणे तो सुद्धा काय चालले आहे या बाहेरील सर्व गोष्टींचे निरीक्षण करत असल्याचे दिसत होते. तिला वाटते की , तो तिला पाहिजे तिथे तिच्या बरोबर जाईल व तिला माहित होते की , ती त्याच्या बरोबर सुरक्षित होती. ही परिस्थिती तिला पुढे काम चालू ठेवण्यास एक महत्वाचे कारण होती.
      दिल्लीतील तिचे शेवटचे काम होते की,, पुष्करमधील प्रसिद्ध उंट बाजार पाहण्यासाठी ती नोव्हेंबरमध्ये तिच्या उर्वरित फेलोशिप महिन्यात परत येऊ शकेन का हे विचारणे.
  • Camel Karma – Chapter 3 – साद्री


    रबारी किंवा रायका यांत दोनप्रकार आहेत. मारु रायका व चालकिया रायका.
    मारु रायका जास्त वरच्या श्रेणीचे समजले जातांत. ते चलकियांच्या मुलींशी लग्न करतात. पण आपल्या मुली त्याच्याकडे देत नाहीत. फक्त ऊंटांमध्ये व्यवहार करतात. चलकिया रायका मुख्यतः शेळ्या व मेंढ्यांचे मोठे कळप पाळतात. ते मोठ्या संख्येने गोदवारमध्ये राहतात.
    त्यांच्या बायका पितळ्याचे दागिने घालतात. म्हणून त्यांना पितालिया असेही म्हणतात. ( Castes of Marwar ) census report of 1891. February 1991.

    ती जोधपूरमध्ये, घुमर टुरिस्ट बंगल्यांत उतरलेली असते. तिथल्या मॅनेजरला ती सांगते की, तिला चांगल्या ड्रायव्हरची गरज आहे. आत्ता पर्यंतचा तिचा ड्रायव्हर बद्दलचा अनुभव चांगला नसतो. ते कधी येतच नाहीत तर कधी उशीरा येतांत तर कधी पैशांवरून वाद घालतात.
    आदल्या दिवशी रात्री ती बिकानेरहून जोधपूरला टुरिस्ट बसने आलेली असते. तिला साद्रीला डॉ. देवाराम देवासीला भेटायला जायचे असते. टुरिस्ट बंगल्याच्या बाहेर नवीन कोऱ्या ॲंबेसिडर गाड्यांचा ताफा ऊभा असतो. मॅनेजर एका ड्रायव्हरला घेऊन येतो. तिला तो असाधारण वाटतो. कुठेतरी तिला मनातून वाटते की हा ड्रायव्हर तिला लाभदायक ठरेल. राजस्थानातील प्रसिद्ध व मुख्य दोन पूर्वीची राज्ये म्हणजे मारवाड व मेवाड. मारवाड म्हणजे “मृत्युचा प्रदेश”, कारण तो प्रांत मुख्यत्वे सपाट भीतिदायक वाळवंटाचा आहे. जोधपूर त्याची राजधानी व राजाच्या राज्यकारभाराचे आसन होते. त्यांचा प्रवास डोंगराळ व जंगल असलेल्या मारवाडकडे चालू होतो. जो उदयपुरच्या महाराणाचा प्रांत असतो. शंभर किमी गेल्यानंतर ते मुख्य रस्ता सोडून लहान रस्त्याला लागतात. क्षितीजावर आरवलीच्या डोंगरांचे अंधुक छायाचित्र दिसू लागते. . भौगोलिक दृष्ट्या आरवली पर्वत राजस्थानच्या उत्तर पूर्वेकडून नागमोडी वळण घेत दक्षिण पश्चिमेकडे जातो व थरचे वाळवंट व एक कुबडाच्या उंटाचा प्रजननाचा प्रदेश येथील पूर्वेकडची सीमा तयार होते.

    त्यांनी मारवाडचे वाळवंट पार केले व ते गदवालला येतात. हा अरवलीच्या पायथ्याचा प्रदेश सुपीक व सौम्य हवामानाचा आहे. त्यामुळे दोन्ही राज्ये ह्या प्रदेशावर स्वामित्व सांगत. खेजरी व बाभळीच्या झाडांची गर्दी वाढते. पिंपळही दिसू लागतात. बुजगावणे असलेली हिरवी शेतेही दिसू लागतात. गावांच्या वेशीजवळ आल्यावर फळबागा व किरमिजी रंगाच्या बोगनवेली रस्त्यांला लागून असलेल्या भिंतीवर उंच चढलेल्या दिसू लागल्या. सूर्य अस्ताला जात होता व त्याच्या सौम्य पण तेजस्वी प्रकाशांत सगळा परिसर नाहून गेला होता. अशा वातावरणांत ते साद्री या छोट्याश्या डोंगरांच्या रांगेत असलेल्या गावात येतात. भाजी मार्केट पार करून ते पशुवैद्यकीय हॅास्पिटलच्या मोठ्या इमारतीपाशी येतात. बरेच दिवसांनी भेटलेल्या नातेवाईका सारखे डॅा. देवाराम त्यांचे स्वागत करतो. त्याच्याकडे आणखी एक पाहूणा दिल्लीहून आलेला असतो.त्याचे नाव विनय श्रीवास्तव असते. तो मानववंश शास्त्रांचा विद्यार्थी असतो. त्याचे रायकांवर संशोधन चालू असते. रायका व त्यांचे उंट या संबंधी प्रत्यक्ष जागेवर भेट या संबंधी त्या दोघांनी मिळून पुढच्या काही दिवसांचा आराखडा आखलेला असतो. विनय सांगतो की , येथे गोदवालमध्ये चलकिया रायका मोठ्या संखेने आहेत. ते मारु रायकांशी लग्न करत नाहीत. त्याची फेटा बांधण्याची पद्धत व त्यांच्या चालीरीती मारु रायकांपेक्षा वेगळ्या असतात. पण ते एकाच थाळींतून जेवतात. कमल कोठारींनी सांगितलेली माहितीच विनय देतो. रबारी हे सर्वसाधारण नाव आहे. गुजराथमध्ये जास्त रबारी आहेत. ते जास्त जनावरे पाळतात. रायका या नावाने मारवाड मधील रबारी ओळखले जातात. ते मुंख्यतः उंट पाळतात व त्यांचे प्रजनन करतात व शिकलेले रबारी देवासी म्हणून ओळखले जातात. पण या सर्वांचे मूळ एकच आहे. नंतर त्याने सांगितले की, मारवाडला रायका जैसलमेरमधून आले जे सर्वात पश्चिमेला असलेल शहर पाकिस्तानच्या जवळ आहे. तिथे ते बहुदा अफगाणिस्थानातून आले किंवा पर्शिया मधून आले.

    रायकांच्या मुळाविषयी खूप वेगवेगळी व गुंताागुंतीची मते आहेत. तिला साद्री गाव आवडते. तेथे खूप गर्दी व घाई नसते. त्या गावाचे स्वतःचे विश्व असते. तेथे हॅाटेल्स नसतात. पण मुक्तीधामचे हॅास्टेल असते. साद्रीमध्ये रेस्टॅारंटही नसतात. अेक खाणावळ म्हणजे एका भिंतीत मोठे भगदाड असते. तिथे या तिघांना बसायला कशीबशी जागा व चूल असते. मोठी ज्वारीची भाकरी त्यावर तुपाची धार तिखट चटणी व लाल रश्यातल्या भाज्या या सर्वांने तिचे तोंड चांगलेच पोळते. धर्मशाळेतील लहान थंड खोली किरकिरणारे लोखंडी दार , खोलीत आधीच कोणीतरी वापरलेले जाडेभरडे ब्लॅकेट असते. तिच्या नोटस् लिहिण्या आधीच तिला झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला मोरांच्याआर्त ओरडण्याने जाग येते. मंदिराच्या हिरळीवर एक मोर व अनेक लांडोर नाचून एकमेंकांना आकर्षित करत होते. नंतर ते लटाडा गांवांत जातांत. आठपैकी पाच रायका कुटुंब उंट पाळत होते.तेथे ते सावंतिबा रायकाला भेटतात. तो त्यांचे रामराम म्हणून ऊत्साहाने स्वागत करतो. त्याच्या गेरुने रंगविलेल्या झोपडीच्या अंगणात वीस उंट दाटीवाटीने बसलेले असतात. इल्स व देवारामला सावंतिबा पर्यंत पोचायला त्या उंटामधून मार्ग काढावा लागतो. देवाराम त्यांच्या येण्याचे कारण सांगतो. सावंतीबा उंच अतिशय बारीक व संपूर्ण पांढऱ्या कपड्यांत असतो. घरातल्या चुलीतून येणारा धूर गोलाकार ( चक्राकार ) फिरत आकाशांत पसरतो. वारा कडुनिंबाच्या झाडांमधून सळसळत होता. कळपांतील उंट हळूहळू ऊठायला लागतात . त्यांच्यात एक नर असतो व दोन नवीन जन्माला आलेले उंट असतात. त्यातील एक आजूबाजूला उड्या मारण्याचा प्रयत्न करतो. दुसरा उभे राहण्याचा प्रयत्न करतो पण खाली पडतो. सावंतिबाचा नातू त्या पहूडलेल्या उंटामधून त्यांच्याकडे येण्यासाठी उंटाच्या बाहेर आलेल्या मांडीच्या हाडांचा आधार घेत मार्ग काढतो.
    ते पाहून तिला परत तिचे कॅालेजचे दिवस आठवतात . त्यांना सांगण्यात आलेले असते की, मोठी जनावरे संभाव्य धोकादायक पशू असतील. मोठ्या जनावरांजवळ त्यांना बांधल्याशिवाय जाऊ नका . नाहीतर त्यांना झोपवा किंवा गुंगीचे औषध द्या. पण इथे तिला फार वेगळा अनुभव येतो. हे उंट त्यांच्या कुटुंबाचे सदस्य वाटत होते. त्यांना अतिशय प्रेमाने वागवले जात होते. कोणाला त्यांची भीती वाटत नव्हती. तिला तिचे जॅार्डनमधलेही दिवस आठवतात. नंतर साधारण एक बारा वर्षांचा मुलगा तिला उंटाच्या दुधाचा वाफाळलेला चहा आणून देतो. हे पेय अनेकतास उंटांच्यामागे फिरतांना शक्ती देणारे असते.

    सावंतिबा त्या लाल फेटा घातलेल्या मुलाला त्या पडलेल्या उंटाला उभे करायला सांगतो. तो मुलगा त्या बछड्याशी बोलतो. त्याला थोपटतो आधी बसायला व नंतर उभे राहायला मदत करतो. तो उंट धडपडत तिच्याकडे येतो. तेव्हा इल्सला समजते की काहीतरी गडबड आहे. ती सावंतिबाच्या सांगण्यावरून त्याला तपासते तेव्हा तिच्या लक्षांत येते की त्याच्यामध्ये काहीतरी जन्मतःच व्यंग आहे. जसजसा तो मोठा होईल तसा तो सुधारेल असे ती सांगते. सावंतिबा सांगतो की , सध्या त्याच्या कळपाला खूप समस्या आहेत. अनेक गर्भपात, अपुऱ्या दिवसांचे जन्म, नवीन जन्माला आलेल्यांचा मृत्यू इत्यादी अडचणीना तोंड द्यावे लागते आहे. त्याच्यामते गर्भपात , कदाचित कळपाला नुकत्याच झालेला खोकला व निमोनियामुळे असणार. सावंतिबाच्या भावाचा एक उंट आदल्या दिवशीच अचानक मरतो. तो कशामुळे मेला हे समजत नाही. ती सुचवते की त्या उंटाचे काही नमुने ( सॅम्पल्स) घेऊन लॅबोरोटरीत पाठवा. पण देवाराम सांगतो की तिथे जवळपास अशी लॅब नाही व मेलेल्या प्राण्याला हे लोक हात लावत नाहीत. सावंतिबाची व त्या तिघांचीही निघायची वेळ होते. ते त्या नवीन पिल्लाला शक्तीसाठी व पाय सरळ करण्यासाठी औषध द्यायचे व परत यायचे आश्वासन देतात. ती त्या लाल पागोटा बांधलेल्या मुलाचे नाव विचारते ज्याने अतिशय चपळाईने त्या उंटाच्या वासराला उभे केलेले असते. त्याचे नाव सावाराम असते. तो १२ ते १३ वर्षाचा मुलगा सावंतिबाच्या लहान भावाचा असतो. लौकरच तो मुंबईला मिठाईच्या दुकानांत कामाला जाणार असतो. हे ऐकून इल्सला धक्काच बसतो. हा शांत व मोकळ्या गावातला मुलगा मुंबईच्या गर्दीत कसा राहील असे तिला वाटते. नंतर ते जेव्हां त्यांच्या गाडीशी येतात तेव्हां त्यांच्या गाडी भोवती अनेक मोठ्या शिंगांच्या गाई व म्हशी उभ्या असलेल्या दिसतात. अशा गावातल्या जनावरांच्या कळपाला चापा असे म्हणतात. ते त्या गावच्या गुराख्याची वाट बघत असतात. गावातील प्रत्येक घरांत एक गाय असते. या सर्वांना चरायला घेऊन तो जातो व संध्याकाळी परत आणतो. ही सर्व गुरे आपापल्या घरी जातात . त्याला’ गउल’ म्हणतात. त्यांना या गुरांच्या आजारा विषयी पारंपरिक जास्त चांगली माहिती आहे असे देवाराम सांगतो. तिला पहिल्यांदाच तिच्या पशुवैद्यकीय ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल खंत वाटते.

    पुढच्या तीन चार दिवसांत या दोघांच्या बरोबर ती आणखी कळपांना भेट देते. ड्रायव्हर अतिशय मदत करणारा असतो. त्याची काहीही तक्रार नसते. सकाळी सहा वाजल्या पासून ते अगदी रात्रीपर्यंत. सावंतिबा हा एकटाच रायका उंटांच्या आजाराविषयी तक्रार करीत नसतो ,तर इतर अनेक उट प्रजोत्पादन करणाऱ्या रायकांच्या गर्भपात, अनेक उंटांचे मृत्यू, अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण इ. समस्या असतात. राजाराम या एका प्रतिष्ठित रायकाच्या मते गर्भपात हे टीबुरसा ( Trypanosomiasis ) या ऊंटांच्या आजारांमुळे होत असणार. हा आजार मलेरिआा सारखा रक्तातील पॅरासाइटमुळे होत असणार व तो एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला माशा चावून होत असणार. रायकांना या आजारावर ऊपाय माहित नव्हता. ते या रोगाने पछाडलेल्या उंटाला तीन वर्ष वेगळे ठेवत असत. रायका टिबुरसा ओळखण्यांत पटाईत होते. ते लघवीच्या वासावरून ओळखत. त्यांची खास पद्धत होती. ते उंटाची लघवी व वाळू यांचे अंड्याच्या आकाराचे बॅाल तयार करत. नंतर दहा मिनीटांनी वाळवून ते फोडून हुंगत. इल्सही एक बॅाल हुंगते तेव्हा तिला ॲसिटोनचा वास येतो व तिला आठवते की पूर्वी तिच्या प्रॅक्टीस मध्ये काही गाईंना एसिटोनेमिया (acetonemia )हा आजार झाला होता. गमनाराम रायकाच्या मते उंटांना पुरेसे अन्न मिळत नसे म्हणून हे गर्भपात होत होते. इल्सला रायका स्रियांविषयी अतिशय कौतुक व आश्चर्य वाटते. त्या अष्टपैलू असतात. त्या शेळ्या मेंढ्या विकण्याच्या व्यवहारांत भाग घेत. त्या खूप कष्टांची कामे करत. त्या परंपरेने आलेल्या आचार, विचाराने बांधलेल्या होत्या. त्याच्या नवऱ्यांच्या सगळ्या आज्ञा त्या हसतमुखाने झेलत. त्यांचे पेहराव, रोजचे कपडे, मोठ्ठे घेरदार लांब घागरे, नाकातील पितळ्याची मोठी सुंकले, व इतर चांदीचे दागिने या असल्या भरगच्च पेहरावांत त्या पाणी व जळणासाठी लाकूड आणत .जनावरांचे गोठे साफ करत, स्वयंपाक करत, मुलांना शाळेसाठी तयार करत, त्यांच्या नवऱ्यांसाठी रोट्या व चटणी तयार करत व कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी आठ तास रस्त्याची कामे करत. ती स्वःताची त्या नारी शक्तीशी तुलना करते व ती स्वतःला फार कमी समजते. (कमी कर्तबगार) रायका पुरुषांचे आयुष्यही कठीण असते. दिवसभर उन्हातान्हांतून ते आपल्या चरणाऱ्या उंटाच्या मागे असतात. त्यांचे दिवसभराचे खाणे म्हणजे त्याच्या खांद्यावर बांधून दिलेल्या रोट्या आणी चटणी. सूर्यास्ताला घरी आल्यावर त्याच्या कळपांतील उंटांच्या जखमा बघणे, जनावरांचे दूध काढणे व नंतर शेकोटी भोवती बसून कुटुंबाबरोबर जेवण करणे. यात कधी बदल होत नसे. ऊन, पावसाळा, हिवाळा उन्हाळा ही दिनचर्या चालू असे. अगदी आजारी पडले तरी त्यातून सुटका नसे.

    उंट हे शेतांत चरत, किंवा पावसाळ्यांत त्यांना जंगलांत सोडत. अनेक उंट त्यांच्या वय्यक्तिक नावाला प्रतिसाद देत असत. बहुतेक वेळेला नावे त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यावरअसत. उदा.काणी ( एक डोळा असलेली ) झिपरी, मेवारी इ. ते पाच वेगवेगळे आवाज काढून उंटांशी संवाद साधत. या वेगवेगळ्या आवाजांनी, त्यांना चालायला, थांबावयाला, एकत्र जमा व्हायला,खायला ऑर्डर देत. ऊंटपाळ त्या सगळ्यांच्या मधून सहज फिरत असे. बहुतेक उंट सौम्य व शांत असत. त्यांचे दूध काढतांना ते शांतपणे उभे रहात. काही माद्या सहज दूध देत , काहींना त्यांचे बछडे समोर लागत, तर काही ठराविक लोकांनाच दूध काढू देत.
    उंट सर्व साधारणपणे सौम्य व शांत असतात. इल्स संपूर्ण परकी असूनही ती त्यांना थोपटू शकत होती. उंटांना त्यांच्या कानामागे खाजवलेल आवडत असे. काहीं दिवसांनी त्यांना मिळालेली माहिती बरीच सुसंगत होती. सरासरी रायकांच्या कुटुंबात त्यांच्या वासरा सहित दहा ते वीस मादी उंट असतात व काहींवेळा एक नर उंट प्रजननासाठी असतो ृ. तरुण उंटांना कामासाठी गाड्यांच्या मालकांना व शेतकऱ्यांना विकणे हा मुख्य उद्देश उंटांचा कळप
    पाळण्याचा होता. हे वर्षांतून एकदा पुष्करला उंटांच्या मेळ्यांत होत असे. उंटांचे शेण हे अतिशय चांगले खत म्हणून त्याचा प्रभाव दीर्घ काळ टिकणारा असतो व त्याचे विघटन होण्यास तीन वर्ष लागत. त्याची शेतकऱ्यांना विक्री होत असे, धान्यासाठी अथवा रोख रकमेसाठीं. हे सर्व व्यवहार सांभांळणे हे पूर्णपणे बायकांच्या कार्यक्षेत्रात येत असे. त्या उंटांच्या शेणाचे ढीग त्यांच्या अंगणांत ठेवत. जर उंटांचा मुक्काम रात्री एखाद्या शेतात असेल तर रायकांना चहा, पीठ व बिड्या मिळत असत व काही वेळेस खते देण्याच्या बदल्यात रोख रक्कमही मिळत असे. चौथे उत्पादन होते केस, जे होळीच्या वेळेस एकदा कापले जात असत. पण चरण्याची सोय दिवसेंदिवस कठीण होत चालली होती व हे एक कारण होते ज्यामुळे रायकांनी उंटांचे प्रजनन करणे सोडले होते. काहींनी आपले उंट विकून टाकले होते तर काहींनी दुसऱ्याला सांभाळयाला दिले होते. वीस उंटांना चरायला द्यायचे शुल्क ३०००रु वर्षाला होते. नवजात वासरांना विकून त्यांचे पैसे मालकाला द्यायची त्यांची जबाबदारी होती.
    एक दिवस पशुंच्या हॅास्पिलमध्ये बसून त्यांनी रायकांचे उंट प्रजजनांतून येणारे ऊत्पन्न मोजले. मुख्य उत्पन्न तरुण उंटांच्या विक्रीतून होते. समजा रायकांकडे बारा प्रजननासाठी मादी उंट असतील आणि प्रत्येक दुसऱ्या वर्षी मादी गरोदर राहत असल्या तर कुठच्याही एका वर्षी त्यांतील सहा जणींना पिल्ले होतील . त्यांतील पन्नास टक्के नर असतील तर दरवर्षी तीन तरुण उंट विकायला असतील. त्यांची किंमत हजार ते तीन हजारामध्ये असेल. याप्रमाणे वर्षाचे उत्पन्न तीन ते नऊ हजारामध्ये असेल. पण आपण असे धरून चाललो की, यांत कुठच्याही प्रकारचे नुकसान त्यांच्या गर्भपाताने अथवा वासराच्या मृत्यूने असणार नाही.
    अर्थात थोडी जास्त मिळकत उंटांचे शेण विकून व इतर काहीजणांच्या उंटांचे कळप पाळून होऊ शकते. पण इतरही खर्च होते. मुख्यतः जंगलांत चरण्यासाठी लावलेले शुल्क. हे फारसे फायद्याचे नाही. ईल्स म्हणते, “तिला उंट आवडतात पण, आर्थिक दृष्टिकोनातून याला काही अर्थ रहात नाही व ते इतर काही कामाकडे का वळत नाहीत?” मुद्दामून थोडी प्रक्षोभक होऊन विचारते. विनय व डॅा. देवाराम दोघांनीही धक्का बसतो व ते सांगतात, की तिने हे समजून घ्यायला हवे की उंटांचे प्रजनन करणे ही त्यांची परंपरा आहे. डॅा. देवाराम त्याच्या म्हणण्याला दुजोरा देतो, की हे रायकांचे कर्तव्य आहे. ते, ते एकदम सोडू शकत नाहीत. मग विनय तिला रायकांच्या मुळा विषयी गोष्ट माहित नाही का? असं विचारतो व सर्व गोष्ट परत सांगतो. “पहिला रायका सुमार हा शिवाने (शंकराने) पहिल्या उंटाची काळजी धेण्यासाठीं तयार केला. शिवा ध्यान करत होता. देवी पार्वती कंटाळली. वेळ घालवण्यासाठी ती मातीचे प्राणी बनवत होती . तिने एक पाच पाय असलेला विचित्र प्राणी बनवला व शिवाला त्याच्यात जीव घालयला सांगितला . शिवाने प्रथम नकार दिला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, पाच पायाच्या जनावराला खूप अडचणी येतील. पण पार्वतीने खूप विनवण्या केल्या . शिवाने त्याच्यात जीव घातला व म्हणाला, ‘उठ’ , तो प्राणी उठला पण त्याला खूप अडचणी होत्या. म्हणून शिवाने त्याचा पाय दुमडून पाठीवर ठेवला. ते कुबड तयार झाले. मग पार्वतीने त्याची काळजी घ्यायला एक माणूस तयार करायला सांगितला . नंदीने त्याच्या घामापासून , धूळी पासून पहिला रायका तयार केला.” विनय तिच्याकडे थोडा कठोर दष्टीने बघून सांगतो की, त्यांचे धार्मिक कायदे कानून त्यांना दूध विकण्यास मनाई करते. विनय तिला सांगतो की तिने डॅा. देवाराम कडून ऐकले असेल की, त्यांच्यामध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे . ‘दूध विकले, मुलगा विकला’ म्हणजेच दुधाची विक्रीही मुलांना विकण्या बरोबर समजली जाते. जास्तीचे दूध विकण्या ऐवजी फुकट वाटले पाहिजे. असे मानतात. ही वर्ज्य समजलेली गोष्ट ज्यांनी केली त्यांच्या विषयी अनेक कहाण्या सांगितल्या गेल्या. एकतर पूर्ण उंटांचा कळप मेला किंवा त्या कुटुंबातील सदस्य अचानकपणे दगावले.

    विनय तिला पुढे म्हणाला की तू बिकानेरमध्ये बरोबर निरीक्षण केले आहेस की, “उंटाच्या दुधावर प्रक्रिया केली जात नाही. उंटाचे दूध नेहमी ताजे प्यायले जाते. बाकीच्या जनावरांच्या दुधासारखे आधी न तापवता. पण ते चहासांठीं व खीर करायला वापरता येते.” इल्सला ही गोष्ट आकर्षक जरूर वाटते पण, तिला हे अविश्वसनीय वाटते. पैशांच्या जोरावर चालणाऱ्या या जगांत फक्त कोणी कर्तव्यापोटी व धार्मिक किंवा अधार्मिक म्हणून गोष्टी करेल का? तिला हा विचार पटला नाही. ती त्याबद्दल साशंक असते. रायका उंटांचा उपयोग ठराविक पद्धतीने करतात त्याला काही ऐतिहासिक किंवा पर्र्यावरणीय कारणे असावीत. ऱ्कदांचित त्यांनी हिंदू गाई संबंधीचा पूज्यभाव त्यांच्या जवळच्या जनावरामध्ये पाहिला असणार. तिने विचार केला , की भारतातील मुसलमानाचे उंटांशी कसे संबंध असतील हे जाणणे गरजेचे आहे. त्यांच्या उंटा विषयी रायकां सारख्याच भावना होत्या की, जास्त संधीसाधू भावना होत्या व ते उंटापासून शक्य असणाऱ्या सर्व उत्पादनांचा अरबांसारखा उपयोग करत ? तिला असे वाटते की, उंटाच्या दुधावर प्रक्रिया करण्याविषयी असलेली बंदी किंवा मनाईला सुद्धा काहीतरी तर्कशुद्ध कारण असू शकते. उंटाचे दूध दही, चीज किंवा लोणी बनवणे फार कठीण आहे. प्रथिनांच्या संरचनेशी त्याचा काहीतरी संबंध होता, असे तिला अस्पष्टपणे आठवते. तरीही, पुढच्या काही दिवसात तिने रायकांच्या वृत्ती आणि भावनांकडे जास्त लक्ष ठेवले. आतापर्यंत तिची आवड अधिक तांत्रिक बाबींवर, कळपाची रचना, व्यवस्थापन आणि त्याचा ऊपयोगाची पद्धत यावर होती, आता तिने कान उघडे ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी एक लांब पांढरी दाढी असलेल्या हरजीराम नावाचा रायकाने आणखी कांही सूचना दिल्या सर्व गोद्वार मध्ये एका अतिशय चांगल्या स्थावर मालमत्ता असलेल्या जागेवर त्याची झोपडी एका खडकाच्या माथ्यावर होती जिथून दक्षिणेकडे पसरलेली आरवलीची रांग तसेच उत्तरेला मारवाडच्या मैदानाचे भव्य दृश्य होते . त्याची पत्नी मरण पावली होती, त्याच्या चार मुलींची लग्ने झाली होती . एकुलता एक मुलगा मुंबईत कामाला होता. वयाने आणि अफूच्या व्यसनामुळे तो अपंग असला तरी हरजीराम आपल्या उंटांची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. तो एक दयाळू यजमान होता आणि त्याच्या भावाची बायको झोपडीत चहा बनवत असताना, त्याने त्याच्या धोतराच्या ओच्यातून एक लहान आणि सुरकुतलेली प्लास्टिकची पिशवी काढली आणि काही चिकट, मटारच्या आकाराचे तुकडे काढले व त्यांना देऊ केले. “ही अफू आहे हे डॉ. देवराम यांनी स्पष्ट केले. ती देणे हा रायकांच्या आदरातिथ्याचा, संस्काराचा एक भाग आहे. थोडीशी घेतल्याने काहीही नुकसान होणार नाही,” त्यांनी प्रोत्साहित केले आणि नंतर नमस्ते करण्यासाठी हात जोडून अफू खाण्याचा योग्य शिष्टाचार दाखवला, देवीला नमस्कार करून (“आई माताजी”, डोके मागे झुकवून , डावा हात डब्यात ठेवून, आणि नंतर जिभेच्या मागील बाजूस तुकडा ठेवला व गिळला चारपाईवर बसून त्यांनी आजूबजूच्या देखाव्याचा आनंद घेतला आणि ते चरण्याच्या समस्या, दुष्काळ आणि रोगांबद्दल बोलले . हजिरामला असेही वाटले की अलिकडच्या वर्षांत रोगांचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचे कारण देवता क्रोधित होऊन समाजाला शिक्षा देत आहेत. राईका समाजावर राग आहे कारण ते मादी जनावरे विकत आहेत. पूर्वी, ते असे कधीच करत नव्हते परंतु आता मादी मेंढ्या विकण्याचा सराव केला जात आहे आणि आता मादी उंटही बाहेरच्या समाजांतील लोकांनाही विकले जात आहेत. हे त्यांना कुठे घेऊन जाईल? त्यांच्या मादी प्राण्यांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला हवे . देव आम्हाला रोग आणि दुष्काळ पाठवून शिक्षा करत आहे .” तो चिडून पुढे म्हणाला. माझा मुलगा, घिसूलाल, मुंबईत काम करतो; दगड -कापायचे .तो पैसे कमावतो आणि काही त्याला पाठवतो. पण आता मी या उंटांचे काय करणार? मी आता म्हातारा व दुर्बल झालो आहे व प्रत्येक दिवश जीवन कठीण होत चालले आहे. ” तो म्हणतो.
    त्याचे हे नैराशाजनक विचार त्याच्या भाभीने पितळ्याच्या किटलीतून आणलेल्या चहा व तीन कप बशामुळे मध्येच थांबतात. नंतर तो इल्सला सांगतो की त्याचे काही उंट मॅनगेने आजारी असतात. तो इल्सला त्यांच्याकडे बघायला सांगतो व काय करता येईल विचारतो. हाजीरामच्या आठ माद्या उंट अतिशय वाईट अवस्थेत असतात.).
    काहीजणांच्या अंगावर खाजवल्यामुळे थोडेफारही केस शिल्लक नव्हते. डॅा. देवारामने काळजीने त्याचे डोके हलवले. तो म्हणाला , “हे अतिशय वाईट आहे व पूर्ण कळपाला याची लागण, तरुण उंटासकट होऊ शकते.” त्या उंटांवर लगेचच उपाय करायची गरज असते. त्यांचे पूर्ण शरीर कीटकनाशकाने चोळायला हवे किंवा वापरलेल्या इंजीन ॲाइलने. पण हे खूप जास्तीचे काम असते एकटा हाजीराम ते करू शकला नसता. थोड्या दिवसांच्या अवधीत तिला दोनदा तिचे पशुवैद्यकीय ज्ञान विसरल्या बद्दल पश्चात्ताप होतो. पण सुदैवाने डॅा.देवारामला मॅनगेच्या औषधव्यवस्थे विषयी सर्वकाहीं माहित असते. त्वचेचा रोग( बाधा ) जो लहान किड्यांनी होतो व ते त्वचेत घुसतात. हा टीबुरसा खेरीज उंटाना होणारा मोठा रोग आहे. यासाठी अनेक ऊपाय आहेत. पुर्वापार वापरांत असलेली व स्थानिक पातळींवर बनवलेली तेल,किंवा व्यावसाईक रीतिने बनववलेली किटकनाशिके . त्यासर्वांमध्ये पूर्ण उंटाला बुडवून किंवा ते उंटाच्या अंगाला जोरांत चोळण्याची गरज असते. उंटाच्याशरीराचा पृष्टभाग खूप मोठा असतो.

    शेवटी, जरी ती उंटांनां बघण्याने , त्यांच्या संबंधी माहिती मिळविण्याने व रायकांशी संबंध जोडण्याने ती उत्तेजित व आनंदी झाली होती तरी तिला असे वाटते की,वैद्यकीयदृष्ट्या अलिप्त राहून संशोधन शक्य नाही. उंट वन्यजीव नाहीत की ज्यांचे ती दूरवर आणि तटस्थपणे निरीक्षण करू शकते, आणि ज्यांच्यापासून तिची संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर ती स्वतःला त्यांच्या पासून वेगळे करू शकेल. ते त्यांच्या धन्याबरोबर आले आणि तिने प्रश्न विचारयाला सुरवात केल्यावर त्यांच्याशी एक नाते निर्माण झाले .नात्याशिवाय, कोणीही तुम्हाला फारशी माहिती सांगणार नाही. जोपर्यंत लोकांना वाटत नाही की तुम्ही निष्ठावान समर्पित आहात व तुम्ही त्यांच्या उंटा विषयी व त्याच्या विषयी आस्था व काळजी बाळगता, तोपर्यंत ते तुम्हांला माहिती देणार नाहीत हा धडा ती बिकानेर येथे शिकली. गोदवार येथे लोक बोलते झाले कारण डॉ. देवराम त्यांच्या समुदायातील होता आणि त्यांने लोकांच्या समस्यामध्ये रस घेतला होता त्यामुळे त्याच्या पशुवैद्यकीय ज्ञानाला खूप मागणी होती. एकत्र बसल्याशिवाय संशोधन शक्य नव्हते, चहाचे भरपूर कप प्यायले नाहीत, पाहुणचार स्वीकारले नाहीत तर लोकांच्या मनात काय आहे हे सांगण्याचा पुरेसा आत्मविश्वास निर्माण होत नाही. विशेषत: चहा घेणे एक प्रकारची कसोटी किंवा परीक्षा होती . (Acid test) हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी तिथे आला नव्हता व, तुम्ही लोकांना व त्यांच्या स्वत: च्या अधिकारांना महत्त्व देता. आणि स्थानिक प्रमाणा प्रमाणे (नियमा प्रमाणे) त्यांच्याशी जोडलेले आहात.

    नातेसंबंध आणि ज्ञानामुळे जबाबदारी आली. त्यावेळेस तिला खात्री नव्हती की त्यानंतर कुठला पेचप्रसंग येईल याची तिला जाणीव मव्हती. कारण तिच्यावर इतरही जबाबदाऱ्या होत्या: तिचे कुटुंब गॅरी, जोन आणि आयशा राजस्थानला भेटायला येत होते.

  • Camel Karma – Chapter 2 – बिकानेर

    मारवाडमध्ये रबारींना रायका असेही म्हणतात. ते लोकसंख्येच्या3.5 % एवढे आहेत. ते उंटांचे खरे प्रजनक आहेत. ते ठामपणे सांगतात की , त्यांचा पहिला पूर्वज महादेवाने पहिल्या उंटाची काळजी घेण्यासाठी निर्माण केला जो पार्वतीने स्वतःच्या करमुणीकीसाठी तयार केला होता.
    ( राजस्थांन गॅझेट १९०८ )o
    नोव्हेंबर १९९०
    दहा लाखांच्यावर उंट असलेल्या, जगात तिसऱ्या नंबरची उंटांची लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशांत इल्स संशोधन करायला येते.
    ती उंटपालन व त्यांचे आर्थिक व सामाजिक व्यवस्थापन यावर संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करते , तो स्वीकारला जातो.
    या विषयावर फारसे संशोधन झालेले नव्हते. तिच्यातुटपुंज्या माहिती प्रमाणे भारतातील उंटपालन हे शेतांतील लागवडीसाठीसुद्धा चांगल्या प्रकारे जोडले गेले होते आणि केवळ भटक्या जमातीच नाही तर , शेतकरी देखील उंट पालन करत. तिने प्रस्तावात हा मुद्दा वापरून असा युक्तिवाद केला होता की भारतीय उंटांची परिस्थिती केवळ अभ्यास करण्यासाठी नाही तर , आफ्रिकन देशांसाठी सुद्धा उपयुक्त धडे देऊ शकते. तिचा अर्ज स्वीकारला गेला व तिला तिचे संशोधन बिकानेर येथील, देशाची मुख्य रिसर्च इंस्टिटूट NRCC -National research Council for Camels यांच्या मार्गदर्शनाखाली करायची परवानगी मिळते. सुदैवाने गॅरीला पुणे येथील डेक्कन कॅालेजमध्ये संशोधन करण्यासाठी फुलब्राईट फेलोशिप मिळते, म्हणून त्यांचे कुटुंब पुण्यात घर करते व तिच्या मुलांना तेथील स्थानिक शाळेत प्रवेश मिळतो. पुण्याहून राजस्थानला यायचा तिचा विचार असतो. तिच्या क्षेत्रिय कार्यासाठी ( field work ) प्रत्यक्ष अनुभवासाठी तिने, भारतीय उंट पालकांबद्दलच्या माहितीसाठी सर्व उपलब्ध स्त्रोत परिश्रमपूर्वक शोधले. अरबी बदाउनी आणि आफ्रिकन संस्कृतीशी साम्य शोधायचा ती प्रयत्न करते. तिने तुरेग,सोमाली, बदाउनी व रेन्डिले यांच्या विषयी भरपूर वाचलेले असते. हा तर्कशुद्ध निष्कर्ष होता की भारतात परंपरागत उंट प्रजनन करणारे व उंट पालक असणार, कारण भारतात धंदे पिढीजात असतात व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातीद्वारे हस्तांतरित केले जातात. पण भारतीय उंटासंबंधीचे साहित्य या विषयावर काहीही भाष्य करत नाही. ती अनेक आहवाल, ग्रंथ पडताळते. यामधून उंटांची शारीरिक शास्त्रीय माहिती असते.पण एकाही अहवालांत तिला उंट पालनाविषयी , त्यांचा सांस्कृतिक पाया , व्यावहारिक बाजू , उंटांची पैदास कशी केली गेली, त्यांचा वापर कसा होत असे हे समजत नाही. त्यांचे सामाजिक व आर्थिक महत्व हे पुष्कळशा साहित्यातून , लेखांतून पुरेसे स्पष्ट नव्हते. फक्त एका संदर्भ ग्रंथात, लेखात तिला राजांच्या वेळेपासून जे उंट पालन करीत त्या रायकाविषयी थोडी माहिती मिळते.
    महादेव व पार्वती यांचा संदर्भ तिला फारसा व्यावहारिक व फायद्याचा वाटला नाही व तिने भारतीय संस्कृतीचा अभ्यासही केलेला नसतो.
    बिकानेरच्या सीमा रेषेवर असलेले NRCC सेंटर अतिशय प्रभावी व आकर्षक असते. पण बिकानेर शहर खूप लांब व अविकसित असते. तेथे जाण्यासाठी रेल्वे व विमानाचे आरक्षण मिळवायला तिला अनेक महिने लागतात.
    शेवटी एका नोव्हेंबरच्या थंडीतल्या सकाळी ती बिकानेरला पोहोचते. रेल्वेस्टेशनपासून तिच्या हॅाटेलपर्यंत जायला फक्त घोड्याचा टांगा हे वाहन असते. पण संशोधन केन्द्राची अतिशय प्रभावी मांडणी असते. ते सायन्स व तंत्रज्ञान यांचे मंदिर असते. हे रक्त विश्लेषण करण्यासाठी, जीवरसायनशास्त्रातील मापदंड आणि हार्मोन्सची पातळी तपासण्यासाठी आणि तणाव घटकांचे मोजमाप करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि तांत्रिक उपकरणे विस्तृत प्रयोगशाळेने परिपूर्ण होते. तेथे एक पाचशे उंटांचं शेत असते. त्यांत भारतातील अनेक मात्तब्बर जातींचे उंट प्रतिनिधीत्व करतात. लांब गुंडाळलेल्या कानांचे बिकानेरी, चपळ जैसलमेरी दुधाचा चांगला पुरवठा देणारे पण मंद व सुस्त गुजरातमधील कच्छ मध्ये, ईमरेटस मधून आलेला उंट या सर्वांचे कुबड ( hump ) चांगले होते कारण त्यांना पौष्टिक अन्नावर वाढवले जात असणार. तेथे कृत्रिम गर्भधारणा व गर्भ प्रत्यारोपण होत असते.
    डायरेक्टर डॅा. खन्ना तिचे मनापासून स्वागत करतात. तिला संपूर्ण केन्द्र दाखवतात व तिने रायका व त्यांचे उंट पाहाण्याची ईच्छा दर्शवल्यावर दुसऱ्या दिवशी एक जीप व पशुवैद्य अनुवादासाठी देतात. ती गधवाला खेड्यात जाते ते बिकानेरपासून काही कि. मी. अंतरावर असते.
    बिकानेरचा आजूबाजूचा प्रदेश वाळूच्या महासागराने भरला होता व रस्त्यावर वाळू वरखाली हेलकावे खात होती. अनेक वाळूचे ढिगाऱे त्यांनी चुकविले लाटांचा सामना करणाऱ्या ट्रॉलरप्रमाणे जीपने वाळूचा सामना केला. अनेक वाळूंचे डोंगर त्यांनी पार केले. जरी जिकडे तिकडे झाडे आणि पशुधन ठिपक्याप्रमाणे पसरले होते तरी , ती वाळू म्हणजे बधण्यास असमर्थ करणार पांढरा शुभ्र रंग होता व मातीच्या-विटांच्या घरांच्या स्वच्छ व निर्मळ वाड्यांमध्ये विखुरलेली होती. पांढऱ्या आणि गेरूमधील या ग्रामीण रंग संगतीतील बहुतेक रंग स्त्रियांच्या पोषाखाशी जोडले गेले होते. त्यांच्या डोक्यावर पाण्याचे हंडे कौशल्याने सांभाळत इतर कामास जात होत्या
    जीप एका पारंपरिक कंपाऊंडला वेढलेल्या मातीच्या भिंतीजवळ उभी राहिली. ते घर रायकाचे होते ज्याच्या नातेवाईकाने NRCC मध्ये काम केले होते . त्यांनी प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच, चारपाईवर डुलकी घेत असलेला एक माणूस घाईघाईने उठला, त्याने पगडी घातली, त्याचे धोतर सारखे केले, आपल्या मोठ्या पांढऱ्या मिशावर परत हात फिरवीत “राम राम” म्हणून त्यांचे स्वागत केले. उंटांच्या मोठ्या कळपाचा मालक कनाराम अशी त्याची ओळख करून दिली. त्याच्या झोपडीचे आवार अतिशय स्वच्छ असते. नीट झाडलेल्या अंगणात आणखी दोन चारपाई आणल्या गेल्या. जरी ते आगांतुकपणे आले होते तरी कुठेही वाळूचे कणही नव्हते. तुटलेली भांडी, इतर पसारा नव्हता.सगळं काही संग्रहालयांत असल्या सारखे व्यवस्थित होते. . कनाराम व
    त्याचे दोन भाऊ मिळून त्यांच्यांकडे तीनशे उंट असतात. पण त्यांच्या उंटांचे कळप वीस कि.मी. वर मुक्त फिरत असतात. हे उंट फक्त पाणी पिण्यासाठी जवळच्या विहिरीवर येतात. फक्त पावसाळ्यांत त्यांना एकत्र केले जाते कारण तेव्हां शेतामध्ये शेती केली जाते. ते चोरीलाही जात नाहीत , कारण त्यांच्यावर त्यांच्या गावाचा शिक्का असतो. एखादे जनावर हरवले तर त्याच्या पायाच्या ठशांवरून त्याला ओळखतात. अशा लोकांना पगरी म्हणतात.
    त्यांच्या उंटापैकी ऐंशी टक्के मादी उंट होत्या.
    त्यांनी नवजात नरांना जन्म दिला की ते पुष्करच्या मेळ्यांत विकतात.
    “उंटांच्या दुधाचा उपयोग नाही का करत?”असे विचारल्यावर कनाराम सांगते की हे उंट. लांब भटकत असतात . त्यामुळे दुधाचा ऊपयोग होत नाही व दुधासांठी त्याच्याकडे गाई म्हशी असतात. “त्त्यांच्या मासाचे काय करतात? ” असे विचारल्यावर तो डॅाक्टर म्हणतो की , “हा प्रश्न चांगला नाही. कारण उंटाचे मास हे
    लोक खात नाहीत कारण ते हिंदू आहेत . हा प्रश्न विचारू नका. उंटांविषयी त्यांच्या भावना खूप उत्कट आहेत.”
    कनाराम सांगतो की पूर्वी लग्नांत हुंडा म्हणून उंटांना द्यायची पद्धत होती पण आता ती कोणी पाळत नाही. त्याच्या लग्नांत त्याला एकवीस माद्या व एक नर हुंडा म्हणून मिळालेला असतो.
    गधवालाचे रायका बिकानेरच्या महाराजांच्या उंटांचे पालन करत.
    नंतरच्या काही दिवसांत ती आणखी रायकांच्या वस्त्यांना भेट देते. त्यापैकी एक नोख (Nokh ) नावाचे गांव असते. त्या गांवातील रायका तिला सांगतो की, त्यांच्या पुर्वजांनी जयसलमेरच्या महाराजांचे उंट सांभाळले होते. पण तिला रायकांच्या खूप वस्त्या दिसत नाहीत. तिल असेही समजले की, मुस्लिम जमातीला उंटा विषयी खास आकर्षण आहे. ते उंटांचे दूध तीन वेळा काढतात , त्यांच्या शर्यती लावतात व त्यांना नाचायला व नमन करायला शिकवतात.
    तिची उत्सुकता खूप शिगेला पोहोचते .
    ती पहिल्यादांच ऐकते की , उंटपालक त्याच्या मासाचा उपयोग करत नाहीत. इजिप्तमध्ये उंटाचे मास स्वस्त असल्यामुळे गरीब लोक त्याला प्राधान्य देतात, हजारांनी उंट तेथे सुदानमधून ,”चाळीस दिवसाच्या”,रस्त्यावरून येतात,जगांतील सर्व उंट पालक त्यांच्या मासाचा उपयोग करतात.
    रायका उंटांचा वापर कसा करतात त्याचे साधारण चित्र तयार होते. उंटांचा ऊपयोग त्याच्या दुधासांठी फारसा करत नाहीत. जर त्यांच्याकडे गाय, म्हैस नसेल तरच करत. त्याचे मास खाणे निषिद्ध समजतात. त्याचा उपयोग वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर सर्वत्र करतात. उंटांच्या लोकरीचा ऊपयोग ब्लॅकेटस् , रजया व दोऱ्या करण्यासाठी करतात. त्याच्या शेणांत वाळू मिसळून सुंदर भिंती तयार करण्यासाठी वापरत. त्यांच्या हाडांचा ऊपयोग खतांसाठी व चामडीचा उपयोग वेगवेगळ्या आकारांची भांडी करण्यासाठी करत. पण रायका फक्त उंटांचे पालन व प्रजनन करतात.
    उंटांचा वाहतुकीसाठी केला जाणारा मोठा उपयोग बिकानेरमध्ये व त्याच्या आजूबाजूला दिसून येत होता. दोनचाकी व चारचाकी उंटांनी जोडलेल्या गाड्या हे सर्वव्यापी दृष्य
    गजबजलेल्या बाजाराच्या ठिकाणी होते. जवळ जवळ सर्वच गोष्टी उंटांच्या गाड्यांवर वाहून नेल्या जात होत्या. लाकूडफाटा, गॅस सिलींडर, विटा,चारा, कापडाचे गठ्ठे , लोकर व माणसे.
    तिला खूप आश्चर्य वाटले की , उंटांचा उपयोग अन्नासाठी का करत नााहीत जो उंट पाळण्याचा इतर ठिकाणी मुख्य उद्देश असतो तो पूर्णपणे दुर्लक्षित होता. ती विविध पर्यायांचा विचार करते. कदाचित रायका हिंदू असल्यामुळे आणि त्यांनी त्यांच्या जवळचा प्राणी उंटात ही पवित्र गाईची कल्पना पाहिली असावी. की ते शाकाहारी होते आणि मांस वगैरे खात नव्हते म्हणून . एखादे ऐतिहासिक स्पष्टीकरण किंवा पर्यावरणीय कारण होते का? शिवाय, प्रजनन पद्धतीचे अर्थशास्त्र काय होते? रायका त्यांच्या कळपातून चांगली कमाई करत का? कळपाचा सरासरी आकार केवढा होता? ते दरवर्षी किती उंट विकायचे आणि काय फायदा मिळवायचे?
    तिने परत NRCC च्या लायब्ररीत उत्तरे शोधायचा प्रयत्न केला. उंटांवरचे खूपसे साहित्य तांत्रिक व निवडक होते. राजपुतानाच्या आधुनिक पुनमुद्रणाच्या गॅझेटसच्या एका मारवाड राज्याच्या खंडामध्ये तिला एक उंटांचे लष्करी महत्व सांगणारी नोंद मिळते.
    “प्राचीन काळापासून या राज्यात, राज्य उंट तोलाची देखभाल करण्यासाठी एक पद्धत प्रचलित आहे , जुन्या दिवसांप्रमाणे इतर वाहतुकीच्या साधनांच्या अभावी उंट मोठ्या संख्येने ठेवणे आवश्यक होते. ” राज्याचा उंटांचा तोला ( उंटांचा कळप )रायकाकडे असे. ज्यांना राज्याच्या पडीक जमीनीवर चरण्याची परवानगी होती. त्या नोंदीमुळे हे निश्चित होते की, रायकाकडे राजाच्या उंटाची काळजी घेण्याचा वारसा होता.
    . १८८९ ते १८९३ मध्ये बिकानेरच्या गंगासिंग महाराजांनी ५०० उंटांच्या मजबुत सैन्याची तुकडी , “गंगा रिसाला” स्थापन केली होती. गंगा सिंग, एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ब्रिटिश युद्ध मंत्रिमंडळात भारताचे प्रतिनिधीत्व केले.
    नंतर संध्याकाळी ती गावातून हिंडते. गंगासिंगचा बिकानेरच्या वास्तुकलेवरही ठसा उमटलेला असतो. त्याने केलेली गावाची रचना पुरोगामी व भव्य असते. तिथे योजनाबद्ध मार्ग, सर्कल्स, गावात उद्यान व प्राणी संग्रालय असते. आणि हा भाग आता जवळजवळ रहदारी रहित होता. मधोमध किंचित दूर असा भव्य जुनागड किल्ला होता, आतमध्ये मोठे आणि भव्यपणे सजवलेल्या महाल किंवा राजवाड्यांचा समूह होता. लाल सँडस्टोनपासून बनवलेल्या भव्य डिझाइनच्या इमारती बिकानेरमधील अनेक अनपेक्षित ठिकाणी ऊंच कळस आणि बुरुजासह उभ्या होत्या . याउलट, शहराचे नवीन भाग एक असंबद्ध आणि गर्दीने भरलेले शहरी गोंधळाने भरलेलेहोते , ज्यामध्ये स्कूटर, टांगा, तीन चाकी रिक्षा आणि उंट-गाड्या होत्या.

    तिला तिचे संशोधन निरर्थक व असंबद्ध वाटते कारण तिला कुठेही उंटांचे कळप बघायला मिळत नाहीत. फक्त मधूनच दूर अंतरावर भटकणारे उंट दिसतात. ती बीकानेरमध्ये सगळीकडे उंटांच्या गाड्या, जळाऊ लाकडांनी व सर्व प्रकारच्या सामानाने भरलेल्या बघते. उंटांचे प्रजनन करणारा कळप तिला दिसत नाही . बिकानेरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून नुकतीच पदवी घेतलेला, रायकाच्या रुपांत एक आधारवड भेटतो . त्यांचे नाव डॉ देवाराम देवासी होते आणि ज्यांनी विद्यापीठाचे शिक्षण घेतले होते अशा काही मोजक्या लोकांपैकी तो एक असतो. तो लाजाळू आणि मृदुभाषी असतो . तो मेंढीपालन करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबातील असतो. त्याचे सर्व भाऊ आणि त्यांची कुटुंबे अजूनही त्यांच्या मेंढरांच्या कळपासह स्थलांतर करत होते. मुळात त्याची शाळेत जाण्याची कोणतीही योजना नव्हती, पण एका शेजाऱ्याने डॉ. देवरामला वर्णमाला शिकवली होती, ज्याचा सराव त्यांने काठीने वाळूत लिहित शाळा आणि पशुवैद्यकीय महाविद्यालयातून केला होता. प्रचंड संघर्ष करत, त्याच्या कुटुंबावरही मोठा आर्थिक भार पडतो तरीही, तो इतर विद्यार्थ्यांना दूध विकून शिकतो . शहरांत वाढलेल्या पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांपेक्षा त्याचा स्वभाव खूप वेगळा होता. त्याच्या पार्श्वभूमीमुळे आणि त्याच्या सहानुभूतीमुळे, लोक मोकळेपणाने बोलू लागतात, आणि मुलाखती देतात.

    रायका उंटांच्या दुधाचा इतका कमी ऊपयोग का करतात यांचे तो तिला लगेच उत्तर देतो. ” आम्हां रायकांना दूध विकण्यास सांस्कृतिक बंदी आहे. आमच्यासाठी ती देवाची देणगी आहे. आमच्याकडे जास्त दूध असेल तर ते आम्ही वाटून टाकतो. त्यासाठीं पैसे घेत नाही . आमच्या द्रृष्टीने दूध विकणे म्हणजे स्वतःच्या मुलांना विकण्या सारखे आहे . पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्हीं आमच्या मेंढ्याच्या दुधापासून तूप विकायला सुरवात केली आहे. उंटाचे दूध आम्ही ताजे पितो . तापवत नाही व त्यापासून तूप किंवा दही बनवायला आमच्या जातीत बंदी आहे.”
    पण दुर्दैवाने डॅा. देवारामचे बिकानेर मधील वास्तव्य संपुष्टांत येते. त्याची राजस्थांन मधील साद्री या छोट्याश्या गावांत बदली होते. तो इल्सला साद्रीला यायचे निमंत्रण देतो.

  • Camel karma – Chapter 1 – Camel

    उंट हा भटक्यांचा पौष्टिक आहार आहे. त्यांचे वाहतुकीचे वाहन आहे. आर्थिक व्यवहाराचे माध्यम आहे. नवऱ्यामुलीचा हुंडा आहे. वाळवंटातील शेखांची सर्व संपत्ती उंटांमध्ये मोजली जाते. तो बदाऊनीचा नेहमीचा सोबती आहे. त्याचा जिगरी दोस्त आहे. त्याचा मानलेला पालक आहे. तो पाण्याऐवजी त्याचे दूध पितो. ( अतिशय दुर्मिळ असलेले पाणी इतर गुरांसाठी ठेवतो. ) तो त्याच्या मांसावर मेजवानी करतो त्याची कातडी पांघरतो. त्याच्या केसांचा तंबु बनवतो. त्याचे शेण इंधन म्हणून वापरतो व त्याची लघवी केसांसाठी व औषध म्हणून वापरतो. उंट हा त्याच्यासाठी अल्लाची देणगी आहे . फक्त वाळवंटातील जहाज नाही.
    Philip k. Hitti, History of the Arabs (1970 )
    फिलिप के. हित्ती, अरबांचा इतिहास (1970)
    March 1979.
    ऊंटाविषयी इल्सची तीव्र आवड जॅार्डनमध्ये निर्माण झाली. उत्तरेकडील एका सुंदर वाडीत (हंगामी नदीचे कोरडे पात्र, अरेबिक ) जी जवळच्या जॉर्डन नाल्यात वाहून गेली.
    डॅा. कोलर पशुवैद्य असते. ती जॅार्डनमध्ये पुराशास्त्रीय ऊत्खननात जीवशास्त्रीय विश्लेषक म्हणून काम करत होती.
    तिला , तिच्या जर्मनीतील पशुवैद्यकीय कामातून बदल हवा असतो.
    कृत्रिम रित्या गाईंची गर्भधारणा व डुक्करांच्या पिल्लांचे टेस्टीकल्सकाढून टाकणे या कामाचा तिला कंटाळा आलेला असतो. तिला प्राण्यांची आवड असते. तिला हे उत्खननाचे काम आवडते. त्यांच्या टीममध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण असते. त्यांच्या उत्खननाच्या जागेवरून जॅार्डनची घळ दिसत असते. ७००० वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे ऊत्खनन करण्यांचे त्यांचे काम असते. उत्खननातील प्राण्यांच्या हाडांच्या ढिगाऱ्यातून त्या काळांतील त्यांचे खाणे व आर्थिक स्थितीची माहिती गोळा करायचे काम असते.
    त्यांची ही कामांची जागा हिरवीकंच व फुलांनी भरलेल्या घळी जवळ होती . ती आजूबाजूच्या वसहातींसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत होती. इल्स रोज सकाळी गावकऱ्यांना गाढवांच्या पाठीवर पाण्याचे कॅन लादतांना बघत असे.
    एके दिवशी कामाच्या जागेवरून रमत, गमत चालत असतांना तिला व्हॅलीच्या दुसऱ्या बाजूला हालचाल दिसते. नीट निरखून पाहिल्यावर तिला असे दिसते की साधारण शंभर एक उंटांचा काफिला एका रांगेत चढावरून चालत असतो. चपळ , बागडणारे मऊ लुसलुशीत बेबी उंट ,त्याच्यां पावलावर चालत असतात. पाणवठ्याजवळ आल्यावर अतिशय विलक्षण, अविश्वसनीय घटना घडते . एकमेकांना ढकलत पुढे येऊन गर्दी करण्या ऐवजी ते ५ ,५ च्या रांगेत पाणी पिण्यासाठीं पुढे येतात मागचे उंट आपली पाळी येईपर्यंत संयमाने व त्यांचा उंटपालक त्यांना खुणेने व आवाजाने बोलावेपर्यंत शांतपणे ऊभे राहतात. त्यांचा हा शिस्तबध्दपणा पाहून ती अतिशय आश्चर्यचकित होते. उंटांचा आज्ञाधारकपणा , एवढ्या मोठ्या बलवान प्राण्यांच्या मोठ्या कळपावर फक्त एका व्यक्तीचे नियंत्रण , त्यांच्या बछड्यांचे आलिंगन, बागडणे, वातावरणातील गुढता, पूर्वेकडील सुगंध या सर्वांने ती खूप भारावून जाते . तिच्यातील एक सुप्त आंतरिक शक्ती तिला उंटपालकाला भेटायला प्रोत्साहित करते. आपल्या तोडक्या मोडक्या अरब शब्द समुहाने ती उंटपालकाला सांगते की त्याच्या कळपाने मंत्रमुग्ध झाली आहे.
    त्या (bedouin ) बदाउनी उंटपालकाचे नाव अबु जुमा असते व त्याच्या बायकोचे नाव उम जुमा असते. तो तिला आपल्या शेळीच्या केसाने बनवलेल्या तंबूत चहाचे आमंत्रण देतो.
    ते तिला आग्रहाने अनेक ग्लासेस मिंटचा चहा पाजतात. इल्स तिच्याशी व तिच्या फाटक्यातुटक्या कपड्यांतील मुलांशी मैत्री करते. ते अतिशय आनंदी कुटुंब असते . ते इल्सशी हसून खेळून गप्पा मारतात व विनोद करतात. त्यांची संपत्ती म्हणजे दोन फोमच्यागाद्या, काहीं स्वयंपाकाची साधने व तो तंबु. उंट हीच त्यांची खरी संपत्ती असते. एवढे ऊंट ते कशीसाठी पाळतांत ते तिला ऱ्समजत नाही.
    तिला जेव्हां जेव्हां वेळ मिळेल तेव्हां ती उत्खननाच्या जागेवरून निसटून येथे येते व त्यांच्यात मिसळते. तो वसंतऋतू होता त्यामुळे कुरण डॅडेंलियॅानच्या फुलांनी फुललेले असते. मादी उंटांना त्यांची नाके गच्च हिरव्या चाऱ्यात खुपसतांना , त्यांच्या आवडत्या हिरव्या खाद्यने पोट भरताना पाहून तिला खूप समाधान आणि शांती मिळते. उंटांचे बछडे त्यांच्या खांबासारख्या पायांवर शिवाशिवी खेळतांना, त्यांचा आजूबाजूचा प्रदेश न्याहाळतांना, व मधूनच त्यांच्या आईकडे संरक्षणासाठी धाव घेतांना बघण्यांत तिने तासनतास घालवले असतात.
    अबु जुमा खऱ्याअर्थाने त्यांचा पालक असतो.तो हे पाहतो की त्याचे उंट जास्तीत जास्त वेळ हंगामी हिरव्या कुरणांवर चरण्यांत घालवतात. त्तो दिवसभर त्यांच्याबरोबर राहतो. गाणी म्हणतो. त्या उंटांवर कसलीच सक्ती नसते.
    माणूस व जनावर याच्यातील सुंदर नाते ती बघते. पण लौकरच ते कुटुंब तेथून तंबू गुंडाळून निघून जाते. त्यानंतर ऊत्खननाचे काम संपल्यावर जॅार्डनच्या प्रवासातून तिला खूप उंट दिसत नाहीत. जणूकाही हे सर्व एक सुंदर काल्पनिक चित्र होते.
    तिच्या देशांतील प्राण्याना वाढविण्याची पध्दत व या पद्धतीत खूपच फरक तिला जाणवतो. जर्मनीत नुकत्याच जन्माला आलेल्या वासरांना लाकडी खोक्यांत ठेवले जात असे व आईपासून वेगळे करून दुधाच्या पावडरवर वाढवले जात असे.
    तिला प्राण्यांची आवड असते मुख्यतः घोड्यांची, पण तिचा भ्रम निरास होतो. प्राण्याची किमंत त्यांच्या ऊपयुक्ततेवर ठरवली जात असे. पशुवैद्य म्हणून तिचे काम प्राण्यांच्या मदतीसाठी नसते तर त्यांचे मालक जास्तीत जास्त फायदा कसा मिळवतील हे बघण्यासाठी असते . दोनवर्षाच्या तरुण घोड्यांना निर्दयपणे रेसकोर्सवर इतके पळवले जात असे की त्यांची हाडे व स्नायू निकामी होत असत. मग कत्तलखाना हा एकच पर्याय राहत असे.
    धरी परत गेल्यावर उंटांवर जेवढे म्हणून वाचता येईल तेवढे ती वाचते. अरेबियांत प्रवास केलेल्या प्रवाश्यांचे चित्तवेधक खंड ती वाचते. त्यांनी वर्णन केल्या प्रमाणे उंट हे बदाऊनी समुदायाच्या सर्व सामाजिक व भौतिक गरजा पुऱ्या करतात. म्हणूनच त्यांची संस्कृति उंटांना अल्लाची देणगी समजते. उंटांचाअरेबिक शब्द जमाल ( jamal ) म्हणजे सुंदर .
    तिला हे समजते की फक्त बदाऊनी यांच्याच संस्कृतीचे उंटांशी भावनिक बंध नाहीत . उत्तर आफ्रिकेचे तुरेग ( Tuareg ), यांना उंट म्हणजे प्रेमाचे प्रतिक , ईथोपियांतील ‘अफर ‘ जमात उंटाचा मृत्यू, त्यांच्या मुलाच्या मृत्यूपेक्षा महत्वाचा समजतात , कारण उंटाशिवाय त्यांचे अस्तित्व राहणार नाही. केनियातील रेनडिले व गाब्रा जमातीतील सर्व विघी उंटा भोवती असतात. उंटांशी अतिशय घट्ट ( संबंध ) बांधिलकी सोमालीच्या लोकांची आहे . त्यांचे विपूल साहित्य उंटा उंटावर आहे.
    अरेबियातील अनेक प्रसिद्ध संशोधक वाळवंटातील लोकांचा उंटाबद्दलचा स्नेह आणि त्यांची प्रवासवर्णने या प्रजातीच्या गुणांना अमर करतात. नशिबाने किंवा निवडीमुळे जगाच्या उष्ण आणि कोरड्या भागात राहण्यास भाग पाडलेल्या सर्व लोकांसाठी स्वर्गातून पाठवलेला प्राणी म्हणून ते त्याचे वर्णन करतात .
    खरं तर, उंटाशिवाय, बदाउनी वाळवंटात राहू शकत नाहीत व हे भाग उंटाशिवाय राहण्यास योग्य नाहीत. कारण उंट काटेरी, तंतुमय आणि खारट वनस्पतींच्या आहारावर पोसले जातात . उंट वाळवंटातील अन्यथा निरुपयोगी वनस्पतींचे अत्यंत पौष्टिक अन्न आणि उर्जेच्या इतर प्रकारांमध्ये रूपांतर करतात. अत्तिशय तुटपुंज्या व विखुरलेल्या संसाधनांने उंट मोठ्या प्रमाणात दुध हेच मुख्य अन्न व फक्त अन्न वर्षभर उत्पादन करण्यास सक्षम असतात. मास, लोकर व शेण ही दुय्यम उत्पादने ( by products ) आहेत.
    उंट हे एक परिपूर्ण यंत्र आहे जे वाळवंटाचा उपयोग करण्यासाठी बनवलेले आहे . ते अनेक प्रकारे पाण्याची बचतकरण्याच्या यंत्रणांनी सुसज्ज आहे . उंटाचे शारीरिक तपमान कायम नसते. तर तो सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे किंवा थंड रक्ताच्या प्राण्यांप्रमाणे त्याच्या शरीराची ऊष्णता बाहेरील तपमानाशी जुळवून घेतो . उंटाच्या शरीराचे तपमान दिवसाच्या सर्वांत ऊष्ण वेळेस सर्वांत जास्त असते व सकाळच्या थंडवेळी सर्वांत कमी असते. ही एक पाणी वाचवायची चलाख कल्पना आहे. उंटाला फार कमी घाम येतो, त्यामुळेही पाण्याची बचत होते.
    इल्स ऊंट व त्याचे पालन ( domestication) यावर प्रबंध लिहीते. तिल बदाउनी व त्यांचे उंट यावर संशोधन करायला परवानगी मिळते ,पण तिला सरकारी परमिट मिळत नाही. त्यांच्यामते आता उंट पाळणारे बदाउनी जास्त राहिले नाहीत व उंट कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे तिला, तिच्या संशोधनातून बाहेर पडावे लागले व ती परत पुरातत्वप्राणी शास्त्रीय संशोधनाकडे वळते.
    ती अमेरिकन पुरातत्व संशोधक गॅरी रोलेफ्सन याच्या प्रेमांत पडते. लग्नानंतर तिला जोन व आयेशा ही दोन जुळी मुले होतात. ते
    सर्व सॅन दिएगो मध्ये जातात. तिथे गॅरी मानववंशशास्त्राचा प्राध्यापक होतो व ती विद्यार्थ्याना पुरातत्वशास्त्र शिकवते.
    प्रोफेसर बक्री मुसा व त्याचे सहकारी यांच्याबरोबर ती पुर्वेकडील वाळवंटात शेकडो मैल प्रवास करते. रशैदा बदाउनी यांची मुलाखात धेते. त्याच्या कळपाची रचना, चाऱ्याच्या वनस्पती, त्याच्या स्थलांतराचे मार्ग प्रचननाच्या पद्धती, आजारांवर पारंपारिक औषधे इ .ची माहिती करून घेते. रशैदा बदाउनी सुदानमध्ये शंभरवर्षापूर्वी सौदीअरेबियातून आलेले असतात व वेगवेगळ्या प्रकारचे उंट विविध कारणांसाठी बाळगतात. त्यांचा स्वतःची, लालसर रंग लहान, बळकट आणि चांगलेदूध देणारीजात असते . ज्यांची वंशावळ सात पिढ्यांमध्ये त्यांना माहित आहे, अशा उंटांसाठी वेगवेगळ्या गल्फ देशातून खूप श्रीमंत लोक येथे उंटांच्या शॅापींगसाठी विमानाने येत असत . तिचा इथला निवास कमी असतो पण अतिशय फलदाई व आनंददायक असतो. तिला तेथे संशोधन करायचे असते पण परवानगी मिळत नाही.
    सध्या, ती राजस्थानमध्ये राहते आणि जगभरातील पशुपालक, प्राणी संस्कृती आणि शाश्वत पशुधन पाळण्याबद्दल संशोधन आणि लेखन करत आहे.

  • Camel Karma – Introduction

    याच वर्षी मी कर्मधर्म संयोगाने, लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांचा कॅमल कर्माची (Camel Karma) ची लेखिका इल्स कोलर रोलेफ्सन व जयपूरचे लिटफेस्ट (literature festival) यावर लेख वाचला. मी अतिशय भारावून गेले. माझी ऊत्सुकता खूप ताणली गेली इतकी की मी पुस्तक विकत घेऊन वाचून काढले.

    पुस्तकाची लेखिका गेले पंचवीस वर्ष भारतात राहत आहे. एक जर्मन स्री, जिचा या देशाशी, इथल्या मातीशी, संस्कृतीशी दुरन्वयानेही संबंध नाही, अतिशय उष्ण व गरम हवा, भाषेचा गंध नाही, जेवणांत तिखट व अतिरिक्त तुपाचा वापर जो तिला मानवत नाही, रुढ अर्थाने अडाणी जनता, ज्यांच्या स्त्रिया पडद्यांत रहाणाऱ्या, वालूकामय गरम प्रदेश, तरीही ऊंट व त्याचे पालक व प्रजनन करणाऱ्या जमाती यांच्यावर संशोधन करायला ती भारतात येते. पण नंतर राजस्थानातील उंट व त्यांचे प्रजनन करणाऱ्या रायका जमातीच्या उत्कर्षासाठी व उंटाच्या रक्षणासाठीं काम करते. इल्स कोलर राजस्थांनमध्ये १९९१ पासून वास्तव्य करून आहे व आपले आयुष्य राजस्थांनच्या दुर्गम भागांत राहाणाऱ्या रायकां जमातीच्या व त्यांच्या उंटासाठी समर्पित केले आहे. ती LPP ची संस्थापक आहे (league for pastoral peoples). ती २०२४ च्या आंतरराष्ट्रीय कॅमलीडस् या वर्षांची FAO ( food and Agriculture organisation) ची सदस्य आहे. २००२ म्मध्ये तिला उंट व रायका यांचा वारसा जतन करण्यासाठीं, Rolex Association. Award मिळाले . २०१४ मध्ये ‘मारवाड रत्न ॲवार्ड’ व ‘नारी शक्ती पुरस्कार’ या सर्वेाच्च नागरी पुरस्काराने, भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पुढील वर्षी , जर्मनीच्या राष्ट्रपतींनी फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केला. ती Hoofprints on the Land : How Traditional Herding and Grasing Can Restore the Soil and Bring Animal Agriculture Back in the Balance with the Earth (2023) ची लेखिका आहे.

    Camel Karma

  • फुलांच्या आणि फळांच्या देशांत

    मी ८ ॲागस्ट २०२५ गुरवारी, मानसीकडे, डब्लिन कॅलिफोर्निया येथे आले, समर सिझनचे शेवटचे काही आठवडे होते. तरीही मला अनेक रंगांची व प्रकारची फुले दिसत होती.

    माझी आवडते Lagerstroemia indica किंवा Crape mertle सगळीकडे फुलले होते.

    मराठीत आपण याला ताम्हण म्हणतो. ते आपले राज्यपुष्प आहे. यास कोकणात जारूल किंवा मोठा बोंडारा असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव Lagerstroemia speciosa असे आहे. हे वृक्ष ५० फुटापर्यंत वाढतात. त्याला Pride of India किंवा Queen’s Crape Myrtle आपल्या ठाण्याच्या उन्हाळ्यात हे सर्वत्र फुललेले दिसतात. असेही म्हणतात.

    ताम्हणीच्या अनेक प्रजाती आहेत.

    Crape Myrtle मुख्यतः छोटेखानी वृक्ष किंवा झुडुप असते. ते २ ते २० फुटापर्यंत वाढते. याची सालही सुंदर असते. चिव, तुकतुकीत व पारदर्शक असते व भेदातून खाली पडते. फुले अनेक रंगाची असतात.पाढरी, जांभळी, लाल, Crape Myrtle झुडुपांनी अनेक फांद्या असतात. लांब पाने व अनेक उपपर्णे असतात.

    Red Crape Myrtle

    Pink Crape Myrtle
    White Crape Myrtle